I urge Prime Minister Narendra Modi to pay attention to this issue. The NEET exam controversy is no trivial matter; the irregularities have jeopardized the futures of lakhs of students. Moreover, this is not an isolated incident; such things have occurred in the past as well. Currently, there is much celebration over the fact that you have held the office of Prime Minister for a longer period than Pandit Nehru. That’s just a number. It acquires true meaning only if you take a firm stand and decisive action on issues like this. Only then will the next generation remember you. Otherwise, what is the use of a statistic that yields nothing for the country? And this is not a political issue; it is a social one. It concerns the ordeal and mental anguish endured by lakhs of students appearing for the NEET exam and their parents. Supporters, office-bearers, and workers of the Bharatiya Janata Party must have faced this hardship as well. Therefore, the fact that the ruling party at the Centre views this agitation through a political lens is, in itself, a sign of their shortsightedness.
Sonam Wangchuk’s demand is not wrong at all; in fact, the Maharashtra Navnirman Sena had raised similar demands when addressing this issue. The only flaw here is that these protests are being driven by social media algorithms. They have become trapped in a cycle of memes, reels, the quest for engagement, dancing with flags and songs to garner 'likes', and chasing 'million-like' milestones. Sadly, civil society in this country is also getting caught up in this. Citizens here have developed an unnecessary disdain for politics. Consequently, a large, enlightened section of society has distanced itself from politics, getting stuck instead in the pursuit of likes and shares. I have frequently urged people to get into politics, become an active part of the political process, whichever party you choose. Consider how a non-political voice raised against the imposition of Hindi in Maharashtra gained political backing; a movement was built, most parties in the state united, and the government was forced to back down. We must not forget this. That success was not achieved through algorithms, but by mobilizing public opinion.
Unless there is a political motive or an electoral interest at stake, this government will not take any protest seriously. They will invariably label protesters as anti-nationals and sow seeds of suspicion regarding alleged conspiracies. After all, their entire power structure rests on such whisper campaigns and the machinery at their disposal.
The Maharashtra Navnirman Sena fully supports Sonam Wangchuk's demands. Transparency is essential not just in NEET, but across all examinations, and the ministers responsible must resign. As a political party, we stand and will continue to stand firmly behind this movement and the public sentiment driving it. I always urge people to step out from behind their screens, become vigilant, and ask questions. They are currently treating your mandate with blatant disrespect, and they will continue to do so. Do not let them believe that, in the future, they can easily crush your voice, your anger and frustrations. If you allow that to happen, they will not hesitate to silence not just one, but many individuals like Sonam Wangchuk. I often sense an unsettling, tense silence these days; if we remain indifferent, those in power will turn this silence into the deathly quiet of a graveyard.
My party and I have stood, and will continue to stand, in support of any movement striving for a transparent system. But the society must step forward as well.
Raj Thackeray |
Today marks the 19th day of Sonam Wangchuk’s hunger strike. The reports regarding his health and the visuals on television are certainly alarming. It is deeply distressing to say this, but it appears the government has decided to sacrifice Sonam Wangchuk, and by extension, the very space for protest in this country. After all, if this government can remain a silent spectator while the treasury of Lord Ram is being looted, what impact could a citizens' protest possibly have?
Institutions that ought to function impartially have been co-opted, and elections are being manipulated to suit specific agendas. Exorbitant amounts of money are being spent on this, yet the mainstream media largely fails to question the source of these funds. Instead, they are busy discrediting both the opposition and even dissenters within the ruling party, acting on the instructions of their ‘invisible bosses’. And those in the media who speak out, operate under the constant threat of retribution. Consequently, the government finds it all too easy to crush a protest raised for a worthy cause and to inflict physical suffering upon the protester.
There was a time when the Bharatiya Janata Party (BJP) held Sonam Wangchuk in high regard. BJP always cherishes an individual only as long as it serves their convenience. In 2018, Wangchuk was invited to the 'Re-Invest' conference, where the party praised him after listening to his insights on non-conventional energy. Naturally, because the party wanted to showcase its commitment to non-conventional energy. Later, when Ladakh was declared a separate territory, Wangchuk initially appreciated the BJP's move. However, he eventually realized that their intentions were far from honest. Wangchuk demanded separate statehood for Ladakh, two Lok Sabha constituencies for the region, and the protection of local people's land rights; he undertook hunger strikes and protests to this end, yet the government took no action. They offered assurances but failed to follow through. The reason is that stated intentions rarely align with actual motives.
Today, Wangchuk’s demand is simply this: address the chaos surrounding the NEET exam, dismiss the minister responsible for it, and ensure transparency in these examinations. There is nothing amiss in this demand. During the BJP's tenure, irregularities in examinations have been rampant, ranging from the Vyapam scam in Madhya Pradesh and the leaking of NEET papers to the recent leaks of teacher recruitment exam papers. The answer to why this happens under their watch, and why they behave with such callous indifference afterward, is simple: it stems from the unbridled power that comes with controlling all the machinery of the state.
The BJP portrays election victories, often secured through various machinations, as a sign of the people's tacit approval, while simultaneously resenting any questioning. I say ‘BJP’, as their alliance partners lack any independent identity and are effectively controlled from Delhi.
सध्या पंडित नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस तुम्ही पंतप्रधान पदावर बसले आहात याचा आनंद व्यक्त केला जात आहे . किती दिवस पंतप्रधानपद हा एक आकडा आहे दुसरं काही नाही! आज अशा विषयावर तुम्ही ठाम भूमिका घेऊन कृती केलीत तर त्या आकड्याला अर्थ आहे. आणि तरच तुम्हाला पुढची पिढी लक्षात ठेवेल. नाहीतर तो आकडा काय कामाचा ज्याने देशाच्या हातात काहीच पडत नाही !
सोनम वांगचुक यांची मागणी अजिबात चुकीची नाही आणि नीट पेपर फुटीचा मुद्दा ज्या दिवशी फुटला त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही पण त्याच मागण्या केल्या होत्या. पण खरा प्रश्न हा आहे की या देशातील सिव्हिल सोसायटी ही सोशल मिडीयावर अडकायला लागली आहे. या देशातील सिव्हिल सोसायटीने उगाचच राजकीय तुच्छता अंगात बाणवली आहे. त्यामुळे या देशातील मोठा सुजाण समाज राजकारणपासून दूर जाऊन लाईक्स, शेअर यातच अडकला आहे. मी अनेकदा समाजातील लोकांना आवाहन करत आलो आहे की तुम्ही कुठल्याही पक्षात जा पण राजकारणाचा भाग बना. महाराष्ट्रात हिंदी लादण्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला , त्यातून एक आंदोलन उभं राहिलं, महाराष्ट्रातील बहुसंख्य पक्ष एकत्र आले आणि सरकारला माघार घ्यावी लागली. हे विसरून चालणार नाही. हे यश कुठल्या अल्गोरिदमचं नव्हतं तर लोकमत संघटित केल्यामुळे मिळालं होतं.
हे सरकार राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर कदापि कुठल्याही आंदोलनाकडे बघणार पण नाही. ते कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, यांत काहीतरी घातपात आहे असल्या शक्यता पेरत राहणार. कारण या असल्या कुजबुज मोहिमांवर आणि यंत्रणांच्या जोरावर तर यांच्या सत्तेचा डोलारा टिकला आहे.
सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सहमती दर्शवत आहे. फक्त NEET नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने या आंदोलनाच्या आणि लोकभावनेचा पाठीशी आहोत आणि कायम असू देखील.
पण मी नेहमी सांगतो की लोकांनी त्या स्क्रीनच्या बाहेर यावं, सजग व्हायला हवं, प्रश्न विचारायला हवेत. कारण तुमच्या मतांचा अपमान तर हे हल्ली सर्रास करत आहेत आणि करत राहतील देखील. पण उद्या तुमच्या आवाजाला, तुमच्यातला संताप, त्रागा हा पण हवा तसा चिरडता येऊ शकतो हा विश्वास या सरकारांना देऊ नका. कारण तसं झालं तर एक काय अनेक सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंदोलकांना लोळवायला हे सरकार कमी करणार नाही. आत्ताच मला अनेकदा एक विचित्र तणावयुक्त शांतता जाणवत असते, आपण जर असेच बेफिकीर राहिलो तर ही शांतता हे लोकं स्मशान शांततेकडे नेतील.
कुठल्याही पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठी मी आणि माझ्या पक्ष उभा राहिला आहे आणि यापुढे राहील. पण एकूण संपूर्ण समाजाने पुढे यायला हवं.
राज ठाकरे ।
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ?
ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात.
आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे.
माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. *आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे*.
६) आज महाराष्ट्रातील शहरांचा विचका करून ठेवला आहे, आणि याला हे विकास म्हणतात. रस्ते, फ्लायओव्हर्स म्हणजे विकास नाही. हे आमदार खासदार परदेशात जाऊन नक्की काय बघतात हे कळत नाही मला. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आत्ता शहरातील बांधकामं थांबवा.
१ मे ला मिसिंग लिंकचं उदघाट्न झालं आणि पुढे ६०,६५ दिवसांत तिथे पिलर पडून तिथे पाणी गळायला लागलं. फडणवीसांनी भाषणात मिसिंग लिंक प्रोजेक्टला कुठल्या कुठल्या देशातले सल्लागार आणले हे सांगितलं. आणि पुढे आमचा कॉन्ट्रॅक्टर भारतीय हे सांगितलं. इतके सगळे बाहेरून आणले मग कॉन्ट्रॅक्टर तिकडचाच आणायचात. या सगळ्याची वाट लावायला आमचा कॉन्ट्रॅक्टर आहेच. आज कंत्राटदारांना ५६% द्यावे लागतात म्हणे. जर उरलेल्या ४४% मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला अशाच दर्जाचे रस्ते आणि कामं मिळणार.
७) ब्रिटिशांनी बांधलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आज देखील उभं आहे, ब्रिटिशांच्या काळात उभे राहिलेले ब्रिज अजून टिकून आहेत. अमेरिकेत उभी राहिलेली एम्पायर स्टेट बिल्डिंग १४ महिन्यात उभी राहिली पण आज देखील उभी आहे. मग आपल्याकडे काय घडतं नक्की ?
८) नितीन गडकरींच्या खात्याचं काम रस्ते बांधायचं. पण ते सोडून ते बोलत आहेत पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळायचं यावर. हे तुमचं काम नाही ते पेट्रोलियम मंत्री बघून घेतील.
९) इतकं सगळं घडून पण लोकांना राग येत नाही. लोकांना जो काही राग येतो तो ते मोबाईलवर व्यक्त करतात आणि शांत बसतात. मला कोणाची सत्ता आहे किंवा नाहीये याने काही फरक पडत नाही. भाजपचा एक आमदार, विधिमंडळात लोकं कशी गटारात पडून मरत आहेत, झाडं पडत आहेत यावर चर्चा सुरु आहे म्हणून हसतोय. भावनाशून्य झाले आहेत हे सगळे. आणि हे भावनाशून्य झालेत कारण लोकांना राग येत नाहीये.
१०) आपले सत्ताधारी, आमदार फोडता येत आहेत का, खासदार फोडता येत आहेत का, नगरसेवक फोडता येतील का यातच रमले आहेत.
११) लोकशाही कशी जिवंत असते याचं एक उदाहरण सांगतो. याच्या आधी पण सांगितलं आहे पण पुन्हा सांगतो. दुसरं महायुद्ध विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली जिंकलं. त्याबद्दल संपूर्ण इंग्लडने त्यांना डोक्यावर घेतलं पण पुढे ८ महिन्यांनी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. कारण लोकांनी सांगितलं तुम्ही युद्ध काळात उत्तम कारभार केलात पण म्हणून शांततेच्या काळासाठी तुम्ही योग्य नाहीत. माणसं किती सुज्ञ असतात बघा. माणसं फक्त सुशिक्षित असून चालत नाहीत तर ती सुज्ञ असावी लागतात. ज्या देशातील समाज सुज्ञ असतो त्याच देशाची प्रगती होत असते.
१२) मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकची झालेली घटना मान्य करून, खरंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं म्हणायला हवं होतं. पण ते सोडून ते म्हणत आहेत की मी बघून घेईन. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही कुठली भाषा आली ? एक खासदार सांगतो बॉम्ब टाकेन, माझ्यावर ५ खुनांचे आरोप आहेत असं सांगतो. तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही.
१३) आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही सतर्क रहा. मराठी मुलांना नोकऱ्या मिळत आहेत का, त्यांना टेंडर मिळत आहेत का, त्यांना कामं मिळत आहेत का पहा.
राज ठाकरे ।
आज महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या, माझ्या भाषणात दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांचा मुद्दा मांडताना मी चुकीने व्ही फॉर व्हिक्टरी आणि व्ही फॉर विन्स्टन म्हटलं. खरंतर मला भाषणाच्या मांडणीत व्ही फॉर इनव्हिन्सीबल असं अपेक्षित होतं. वी आणि व्ही मधे बोलताना गडबड झाली. ही चूक नंतर माझ्या लक्षात आली म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. बाकी मुद्दे आणि भाषणाची चित्रफीत सोबत जोडली आहेच.
१) २००८ ला रेल्वे भरती प्रकरणावरून आंदोलन झालं, त्यातून पक्ष वाढत गेला, पक्ष मोठा होत गेला. पक्षाला चिन्ह देखील रेल्वे इंजिन मिळालं. २००८ ला जे रेल्वेचं आंदोलन आपण केलं होतं ते विसरू नका. महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीत मराठी टक्का वाढला पाहिजे यासाठीचं ते आंदोलन होतं. त्यावेळेस माझ्यासकट असंख्य महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. खरंतर प्रश्न साधा होता. महाराष्ट्रात जर रेल्वे भरती आहे तर त्याच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रांत न येता त्या उत्तरेकडच्या राज्यांच्या वर्तमानपत्रांत कशा येतात यावरून ते आंदोलन सुरु झालं. त्यावेळेस इथल्या स्टेशनांवर ही उत्तर प्रदेश बिहारच्या तरुणांची गर्दी होती. आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इकडे कशाला आलात त्यावेळेस त्यांच्यातल्या काही लोकांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना शिव्या दिल्या, त्यातून आंदोलन उभं झालं. पुढे या आंदोलनामुळेच हजारो मराठी तरुण-तरुणींना रेल्वेत नोकरी मिळाली. त्यामुळे रेल्वे भरतीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे.
२) मिसिंग लिंकवर दरड कोसळून तिकडे पाणी गळत होतं यावर लोकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्री म्हणतात या घटनेवर राजकारण करू नका. अरे वा ! तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेस काय करत होतात ? तेंव्हा तुम्ही जी आंदोलनं केली, टीका केली, ते राजकारण नाही आणि हे मात्र राजकारण. मुख्यमंत्री म्हणतात एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राला काही बोलू नका. लोकं मिसिंग लिंकबद्दल बोलत आहेत, यात कुठे महाराष्ट्राचा अपमान आला? हे वरपासून खालपर्यंत सुरु आहे. केंद्राची एखादी गोष्ट चुकली आणि तुम्ही काही बोललात की तुम्ही देशविरोधी. लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत ? इतके दिवस सत्ताधारी जे ट्रोलिंग विरोधकांना करत होते, ते यांच्या अंगलट आलं आहे. आज यांच्यावर जेंव्हा दामदुप्पट टीका सुरु झाली तेंव्हा हे मात्र कांगावा करायला लागलेत.
३) राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती याच्यात धर्म कुठे आला ? राममंदिराबद्दल आम्हाला पण आस्था आहे. पण तिथे जेंव्हा १४०० कोटी गायब होतात तेंव्हा आम्ही बोलायचं नाही. बरं आम्ही बोलल्यावर आम्हाला म्हणणार वक्फ बोर्डावर का नाही बोलत. आम्हाला काय करायचं आहे वक्फ बोर्डात काय सुरु आहे त्याच्याशी? या देशातील हिंदू भाविकांनी श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या पैशाचा अपहार होतो यावर बोललो की तुम्ही आम्हाला धर्मविरोधी ठरवणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे म्हणाले की गैरहिंदू या घटनेचा गैरफायदा घेतील. काय बोलताय ? या ट्रस्टवर भाजप, आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांची लोकं आहेत. कल्पना करा असा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता तर? भाजप असो आरएसएस असो की विश्व हिंदू परिषद असो यांनी मोर्चे काढले असते, आंदोलनं काढली असती. त्याला राजकारण म्हणलं असतं तर कोणी ?
४) २००५ ला मुंबईत प्रचंड ढगफुटी होऊन काही तासांत हजार मिलिमीटरच्या आसपास पाऊस पडला होता. त्यावेळेस मुंबई पाण्याखाली गेली होती. यावेळेस ३०० मिलीमीटर पाऊस झाला तरी मुंबईची तशीच अवस्था झाली. त्यावेळेस टीका करणारे आज गप्प का आहेत ? या सगळ्यावर भाजपचे एक मंत्री म्हणतात, ही नैसर्गिक आपत्ती आहे यावर टीका करू नका. तुमच्याकडून झालं की लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते का ?
५) काल मुख्यमंत्री विधिमंडळात म्हणाले मिसिंग लिंकवर राजकारण करणाऱ्यांना बघून घेईन. ही कुठली भाषा ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ना तुम्ही ? बरं ते झाल्यावर हिंदीत पण तेच बोलले ? कोणासाठी हिंदीत बोललात ? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदीत का बोलतो ? बहुदा वरच्यांना सांगत असतील बघून घेईन म्हणून.
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
बॅरिस्टरमधल्या परदेशात शिकून आलेल्या, नव्या विचारांची झुळूक अनुभवलेल्या नायकाला खटकणाऱ्या रूढी परंपराशी सुरु असलेला त्याचा वाद. 'पुरुष' मध्ये पितृसत्ताक व्यवस्थेने जन्माला घातलेल्या सत्ता, हुकूमत या कल्पनांना दिलेलं आव्हान. किंवा वाडा चिरेबंदी मधील जुनी शब्दशः ओसाड गावची सत्ता राहिलेली जमीनदारी नष्ट होण्याच्या काळात, कालबाह्य झालेल्या रूढी परंपरा टाकून, नव्याने स्वतःला सिद्ध करणं यात दोन पिढ्यांच्यातील सुरु असलेला संघर्ष असो. हा संघर्ष विजयाबाईंनी अचूक उभा केला. हे करताना विजयाबाईंनी कोणाला नायक ठरवलं नाही की कोणाला खलनायक. जो तो आपल्या जागी योग्य. मी वर म्हटलं तसं काळ कुठे बदलतोय याचं अचूक भान आणि त्यावरच नाटकातून प्रकटीकरण (expression ) ही फक्त मराठीच नाही तर भारतीय रंगभूमीला विजयाबाईंनी दिलेली देणगी.
विजयाबाईनी पुढे जाऊन सिनेमा केला. जागतिक रंगभूमीवर काय सुरु आहे हे बघून त्यांनी त्याला मराठी साजात सादर केला, पण या सगळ्यातून त्यांनी मराठी थिएटरमध्ये एक शिस्त आणली. तालमी कशा कराव्यात, नटाने कशी तयारी करावी, पाठांतर कसं करावं, आपल्या भूमिकेचं मानसशास्त्र कसं समजून घ्यावं हे इथे किमान २ पिढ्यात रुजवलं. त्यामुळे मराठी नट हे हिंदीत किंवा इतर भाषांत गेल्यावर सहज काम करतात असा अभिप्राय आपण ऐकतो त्याचं मोठं श्रेय विजयाबाईंना जातं. बरेचसे लोक आपण कोण आहोत हे दाखवायला येतात पण काही जणं हे त्या समाजाला शिकवायला येतात . त्यापैकी विजयाबाई ह्या होत्या !
काल विजयाबाई गेल्या. अशी पिढीच्या पिढी घडवणारी व्यक्ती परत कुठून मिळणार हा प्रश्न आहे. अर्थात जर काळाची गरज असेल तर ती निर्माण होते अन्यथा नाही. पण तोपर्यंत विजयाबाईंसारखी व्यक्ती होती, आणि मापदंड काय असतो हे किमान महाराष्ट्राला, इथल्या कलाकारांना विजयाबाईंच्या रूपाने कळेल.
विजयाबाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं निधन झालं. विजयाबाई जवळपास ७० वर्ष तर नक्कीच रंगभूमीवर कार्यरत होत्या. कदाचित गेली काही वर्ष किंवा एखादं दशक असं असेल की त्या कदाचित फारशा सक्रीय नसतील, पण विजयाबाईंसारख्या व्यक्तीच्या असण्याने सुद्धा अनेक माणसं प्रेरणा घेऊन, प्रयोग करत राहतात, त्यामुळे त्यांच्यासारख्यांचं असणं महत्वाचं. जेंव्हा आसपास खुज्यांची खोगीरभरती सुरु आहे असं वाटत असतं तेंव्हा विजयाबाईंसारखी माणसंसुद्धा आहेत हे देखील त्या क्षेत्रातील माणसाला दिलासादायक असतं.
माझी विजयाबाईंच्या बाबतीतील पहिली आठवण १९८८ च्या आसपासची. माझ्या आणि शर्मिलाच्या साखरपुड्यात अर्थात माझ्या सासऱ्यांमुळे म्हणजे मोहन वाघांमुळे पहिल्यांदाच विजयाबईंना भेटण्याचा योग आला . त्यानंर अनेकदा गाठीभेटी झाल्या. मला त्यावेळेस पहिल्यांदा प्रश्न पडला की या मेहता इतक्या सुंदर मराठी कसं काय बोलतात आणि त्यात मराठी रंगभूमीसाठी एवढं काम का करतात ? मग समजलं की मूळच्या विजया जयवंत ! मराठी कुटुंबात जन्मलेल्या ! अर्थात रंगभूमीच्या बाहेरच्या लोकांना अजूनही बऱ्याचदा हा प्रश्न पडतो ! असो . .
माझे मराठी रंगभूमीवर काम करणारे अनेक कलाकार हे परिचयाचे आहेत , अनेक कलाकार, दिग्दर्शक यांच्याबद्दल चर्चा होत असते परंतु जेव्हा कधी विजयाबाईंचं नाव येतं तेव्हा ते सर्व आपापले कान पकडतात ! मी नेहमी सांगत असतो की मला नाटक हा कलाविष्कार कधी समजलाच नाही , म्हणजे त्याची मांडणी ! माझ्या मते नाटक हा विषय चित्रपट , वेब सिरीज , सिरियल किंवा अजून काही असेल यापेक्षा प्रचंड कठीण आहे ! आणि त्यात विजयाबाईंबद्दल ही सर्व मंडळी जेव्हा भरभरून बोलतात तेव्हा समजतं की या बाई देखील त्याहून समजण्या पलीकडे आहेत !
एखादा माणूस काळाला आकार देतो, का काळ त्या माणसाला घडवतं? याचं उत्तर या दोहोंचा संगम जिथे घडतो तिथे काहीतरी सज्जड घडतं.
मराठी रंगभूमीच्या बाबतीत घडलं ते विजयाबाई, विजय तेंडुलकर असतील, डॉ. श्रीराम लागू असतील किंवा त्यांच्यासारख्या इतरांच्या रूपाने. या सगळ्यांना आसपासचा काळ कसा बदलतोय, जग कसं बदलतंय याचं अचूक भान होतं. त्या जगाकडे बघण्याची हिंमत होती. इथे हिंमत होती अशा अर्थाने म्हणतोय की आपल्या जगापेक्षा खरंच काहीतरी वेगळं, मोठं बाहेर सुरु आहे हे बघणं, ते मान्य करणं. आणि आपल्या जगात असलं काही नाही हे मान्य करणं आणि त्यातून काहीतरी आपल्या अस्सल भारतीय, मराठी जाणिवांना साजेसं निर्माण करणं, याला एक वेगळी शक्ती लागते. ती शक्ती त्या काळात अनेकांच्यात होती. ती विजयाबाईंच्यात पण होती.
रंगायन' नाट्यसंस्थेच्या त्या प्रमुख संस्थापक. 'रंगायन'ने प्रायोगिक रंगभूमीला आकार दिला. १९६० च्या दशकांत जेंव्हा रंगायनची स्थापना झाली, तेंव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. तेंव्हा प्रबोधन आणि सामाजिक सुधारणा याच्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात, औद्योगिक पाया रचला जात होता.
यंत्रयुगाशी आणि त्या यंत्रयुगाचा उगम ज्या जगात झाला त्या जगाशी मराठी माणसाची तोंडओळख व्हायला लागली होती. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला सुरुवात झाली होती. साहित्यात प्रयोग होत होते. नेमाडेंचं “कोसला” ज्याने मराठी साहित्यात खळबळ उडवली ते त्याच काळातलं. त्यामुळे मराठी रंगभूमी म्हणजे भव्य सेट्स, मेलोड्रामा याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं नाटक असावं, त्याने किती तिकिटं विकली गेली याची चिंता करू नये, त्याने खऱ्या अर्थाने प्रायोगिक व्हावं याची गरज निर्माण झाली. आणि ती पोकळी विजयाबाईंनी भरून काढली. मराठी सिनेमा बदलायला तयार नसल्यामुळे मोठ्या अपेक्षेने तेंव्हाचा तरुण रंगभूमीकडे अपेक्षेने बघत होता आणि ती अपेक्षा विजयाबाईंनी पूर्ण केली.
विजयाबाईंना कुठेतरी, अस्तंगतला काय चाललं आहे, किंवा गेल्यात जमा आहे याचं एक सुप्त आकर्षण पण होतं आणि भान पण असावं. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांची संख्या मोठी, त्यांनी अभिनय केलेली नाटकं पण अनेक. पण त्यांनी दिग्दर्शित केलेली आणि रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली नाटकं म्हणजे हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, पुरुष, संध्याछाया, वाडा चिरेबंदी.
While this is the story of many temples across India, what can be said about a government that feigns sleep, ignoring the alarm raised by a private auditing firm regarding potential misappropriation of funds at this very temple? First foreign invaders looted these temples for centuries, now are Hindus themselves looting their own temples in some twisted form of retribution? And yet, neither the Prime Minister, the Home Minister, nor a single leader from the Centre is willing to speak up? Or is the usual game of ‘Shah’-Kat Shah (Marathi for chess moves or political one-upmanship), playing out here as well? Assembly elections are due in Uttar Pradesh next year. The opposition will certainly raise this issue then. This would inevitably corner Yogi Adityanath, potentially causing him some damage and stalling his Prime Ministerial ambitions. While this is one possibility, the repercussions of the ongoing internal power struggle within the BJP regarding ‘who comes next’, could manifest anywhere, ranging from the poaching of MPs and MLAs to temples. The country's Home Minister, Amit Shah, is currently preoccupied with hazy dreams of how to dismantle opposition parties and ascend to the Prime Minister's chair as soon as possible; consequently, in his view, there is no reason to attach any importance to what is happening in the abode of Lord Ram.
The Hindu public deserves accountability for the blow dealt to their faith. Those who turned a blind eye while all this was happening must face severe punishment. I believe the Prime Minister’s intentions are sincere, at least in this regard, but good intentions alone are not enough; action is expected. Otherwise, it will have to be said that you and your party, driven once again by the lure of the throne, have sent Lord Ram into exile and pushed his devotees into the Saryu River.
Raj Thackeray
There is no proper accounting of the funds and jewelry received as donations in the *hundi* (offering box) of the Shri Ram Temple in Ayodhya, and there is a distinct possibility of embezzlement. The Special Investigation Team (SIT) probing the matter confirmed this in its preliminary report, and some accused individuals were arrested. I had wanted to write about this since the news first broke, but I was waiting to see how the case unfolded and what lay beneath the headlines.
The country's Prime Minister, Shri Narendra Modi, has maintained his characteristic silence on this issue. It is not just Shri Narendra Modi; not a single minister in the Bharatiya Janata Party (BJP) government has uttered a word about it. Do those who ascended the throne of power in the name of Lord Ram feel nothing about this embezzlement? Has the constant stealing of MPs, MLAs, and office-bearers from other parties made them so habituated to theft of donations made by devotees at the Lord's doorstep? Or is Lord Ram being pushed back into exile because in 2024 people rejected the BJP in Ayodhya?
When the Ram Temple was built in Ayodhya, crores of Hindus across the country experienced immense joy. Hindus had harbored a deep sense of anguish since, Centuries ago, a mosque had been erected after demolishing the temple at the birthplace of the ‘Maryada Purushottam’ (the Ideal Man). In the 1980s, the Vishwa Hindu Parishad and other organizations launched the Ram Janmabhoomi movement. Hindus across the nation rallied behind this movement to uphold their cultural and religious identity. Ordinary Hindus provided financial support. ‘Kar Sevaks’ offered their service, and countless even sacrificed their lives for the cause. The memory of their bodies floating in the Sarayu River remains vivid to this day.
This movement did not belong to any single organization, nor was it solely the Bharatiya Janata Party's (despite their claims to the contrary); Shiv Sainiks participated in large numbers. Indeed, they were at the forefront. Yet not a single leader at the time, not even Balasaheb, sought to claim credit for this movement of Hindu resurgence.
Eventually, the Supreme Court delivered its verdict, clearing the path for the construction of the Ram Mandir at the site of the mosque. However, when the time came for the ‘Pran Pratishtha’ (consecration) of Ram Lalla, the Prime Minister performed the rituals alone; no one else was present in the sanctum sanctorum. If you claim exclusive rights over the deity, do you not also bear the responsibility to address the misappropriation of funds and to reassure the people?
Fundamentally, the Ram Mandir in Ayodhya belongs to the crores of Hindus, Sadhus, saints, and Kar Sevaks of this country. When people offer money, jewelry, or gold, whether as a donation or an act of faith, those offerings carry the scent of hard-earned sweat and are imbued with the sanctity of devotion. Countless women devotees, when they offered gold and jewelry, may have parted with their personal assets passed down through generations. This was an expression of gratitude by devotees who believed that everything they possessed was due to the grace of Shri Ram.
However, there is one thing I fail to understand: it is said that life is infused into the stone idols of our gods and goddesses during their consecration. Why, then, do the celestial weapons held by these deities - such as swords, bows and arrows, maces, and the chakras - not deal with these monsters of men? Or has the ‘stone’ been infused into the devotees themselves? I believe this incident has once again made devotees realize that the offerings made with such faith do not reach the deity but instead line the pockets and fill the bellies of the trustees and priests. Worship the gods and goddesses, certainly, but do not worship these trustees or those who engage in politics through this medium, and do not place any offerings in their hands.
भारतातील अनेक मंदिरांची हीच कथा आहे ! आधी परकीयांनी हजारो वर्ष इथली मंदिरं लुटली आता त्याचा बदला म्हणून की काय हिंदूच आपली मंदिरं लुटत आहेत का ? आणि तरीही देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री किंवा केंद्रातील एकही नेता त्यावर बोलायला तयार नाही ? का अयोध्येत ऐवढा आटापिटा करून निवडणुकीच्या तोंडावर ( उद्घाटन ) करून देखील ना अयोध्येत ना देशात कुठेच फायदा झाला नाही म्हणून याकडे दुर्लक्ष ? अर्थात नेहमी प्रमाणे यांत पण शहा - काटशहा यांचं राजकारण सुरु आहेच ! उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळेस हा मुद्दा स्वपक्षातले योगींचे विरोधक नक्की उचलतील. मग यातून योगी आदित्यनाथ यांची आपोआपच कोंडी होईल, झालंच तर त्यांचं काहीसं नुकसान होईल आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्वकांक्षाना आपोआपच खीळ बसेल. ही एक शक्यता जरी असली तरी सध्या भारतीय जनता पक्षात 'पुढे कोण' यावरून जो सुप्त संघर्ष सुरु आहे त्याचे पडसाद कुठेही उमटताना दिसू शकतात . अगदी खासदार, आमदार फोडाफोडी पासून ते मंदिरां पर्यंत ! देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सध्या विरोधी पक्षांची घरं कशी फोडता येतील आणि लवकरात लवकर आपल्याला पंतप्रधानाच्या खुर्चीत कसं विराजमान होता येईल याची धुरकट स्वप्न पाहत बसलेत म्हणून रामाच्या गृहात काय घडतंय याला त्यांच्या लेखी काही किंमत असण्याचे कारणच नाही !
लोकांच्या श्रद्धेला जो तडा गेला आहे त्याचा हिशोब हिंदू जनतेला मिळाला पाहिजे. हे सगळं होत असताना ज्यांनी ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. पंतप्रधानांचे हेतू किमान या बाबतीत अजून तरी स्वच्छ आहेत असं मी मानतो, पण फक्त हेतू स्वच्छ असून उपयोग नाही तर तुमच्याकडून कृतीची अपेक्षा आहे. अन्यथा तुम्ही आणि तुमच्या पक्षाने पुन्हा एकदा सिंहासनाच्या मोहापायी रामाला वनवासात आणि राम भक्तांना शरयू नदीत ढकललंत असंच म्हणावं लागेल.
राज ठाकरे ।
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतू प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पहात होतो .
या विषयवार देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. श्री. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही ? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का ? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट्यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, करसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य करसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.
हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं (जरी त्यांचा तसा दावा असला तरी ), त्यात शिवसैनिक पण मोठ्या संख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही.
पुढे सर्वोच्च न्यालयालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारायचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेंव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेंव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली. तेंव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची, लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का ?
मुळात अयोध्येतील राममंदिर हे या देशातील कोट्यवधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि करसेवकांचं आहे. इथे देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोकं जेंव्हा पैसे किंवा दागिने, सोनं अर्पण करतात तेंव्हा त्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्देचं कवच असतं. सोनं, दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामामुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता.
परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या आपल्या सर्व देवी देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचे सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्य बाण, गदा, चक्र वगैरे शस्त्रं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत ? की या प्राण असलेल्या भक्तांमधे दगड फुंकला आहे ? आपण श्रद्धेने दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातं हे पुन्हा एकदा या निमित्ताने भक्तांना समजलं असेल असं मी मानतो ! देवी देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्याची पूजा करू नका आणि कोणतही (दान ) या लोकांच्या पदरात टाकू नका !
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
आज २० जून २०२६ रोजी, मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
- मतदारयादी पुनर्निरिक्षण (SIR) या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, आपलं मतदार याद्यांकडे लक्ष नसल्याने काय गोष्टी घडू शकतात हे आपण पाहिलं.
- महाराजांच्या जिरेटोपावर जैनांचा झेंडा, हे इथपर्यंत गेलं? या गोष्टी जाणूनबुजून सुरू आहेत का? निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी हे सुरू आहे का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
- आम्ही हातात बांगड्या नाहीत भरल्या असं म्हणणाऱ्याने मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला वाद नको आहेत पण वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उभे राहू.
- तुम्ही धर्माचं काम करत आहात, ते करत राहा. उगाच नको ते उद्योग कशाला करता? मध्यंतरी कबुतरांचा विषय आला, आता पांढरी पट्टी, हे सगळं राजकारण्यांच्या नादी लागून करतायेत.
- आपल्याकडे खासदार फोडणं सुरू आहे, सत्तेसाठी राजकारण सुरू आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा जनतेनं लक्षं ठेवलं पाहिजे. एक जुनं वाक्य आहे "स्वाभिमान मेला की उरतात फक्त जिवंत प्रेतं."
- इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार देशात सर्वात जास्त २२,१७४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आज शेतकरी आत्महत्या करतायेत, नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करतायेत. राज्यात लहान मुलं, मुली पळवण्याचे प्रकार घडतायेत. एवढं सगळं सुरू असताना आपल्याकडे खासदार, आमदार, नगरसेवक फोडण्याचं काम सुरू आहे.
- या आमदार, खासदार पळवापळवीमध्ये आपण आपल्या मुलभूत गोष्टी विसरून जातोय. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास, देशाची परंपरा आपण विसरत चाललोय.
- केंद्राच्या रिपोर्टनुसार MSEDCL ला पॉवर डिस्ट्रिब्युशनमध्ये १०० पैकी दीड गुण मिळालेत. MSEDCL चा आता IPO येत आहे अशावेळी दीड टक्का मिळालेल्या कंपनीत गुंतवणूक करायला कोण येणार? कंपनी अदानीच्या हातात देऊन महाराष्ट्राचा वीज पुरवठा ताब्यात घेण्याचं हे कारस्थान आहे.
- कोण सत्तेवर आहे याने मला फरक पडत नाही. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय याने मला फरक पडतो. सत्तेवर बसून चुकीचे पायंडे पाडले जातायेत याचं कोणाला भान उरलेलं नाहीये.
- आपलं आंदोलन घरापर्यंत पोहोचतं पण घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही याला काय म्हणायचं? आपल्या आजूबाजूला काहीतरी षडयंत्र रचलं जातंय याची आपल्याला कल्पना आहे का?
- लवकरच जनगणना सुरू होत आहे. माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, डोळ्यात तेल घालून या जनगणनेवर लक्ष ठेवा. काही ठिकाणी, घर गणनेच्या वेळेस भाजपचे लोकं तिकडे हजर असतात. ते अंदाज घेत आहेत की या घरात आपले मतदार आहेत का नाही? जर त्यांना वाटलं, नाही तर त्यांची नावं काढून टाकण्याच्या हालचाली सुरु होतात. तुम्ही आंदोलनं करता, ती लोकांना आवडतात, लोकांपर्यंत पोहचतात पण त्यांची मतं आपल्यापर्यंत का पोहचत नाहीत याचा विचार करा. ३ वर्षांनंतर निवडणुका आहेत म्हणून गाफील राहू नका.
- निवडणुकीचा खेळ कसा खेळला जातोय, किती चालाखीने खेळला जातोय याची कल्पना आपल्याला नसेल तर निवडणुका लढवण्याला काहीही अर्थ नाही.
- मी २०१९ला सांगत होतो निवडणुकांवर बहिष्कार टाकायला हवा, ज्या प्रकारचं राजकारण, ज्या प्रकारच्या निवडणुका सध्या सुरू आहेत हे पाहता हाताला काही लागणार नाही. आणि लागलं तरी हे आमदार, खासदार पळवून नेतील.
राज ठाकरे ।
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, हितचिंतकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
१४ जून या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स लावता . वाढदिवसाच्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांना भेटणं हे खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईत नसल्यामुळे तुमची भेट होऊ शकणार नाही.
पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की माझा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमातून साजरा करा. शुभेच्छांची होर्डिंग्स लावून, शहरंच्या शहरं रंगवण्याच्या ऐवजी हा वाढदिवस जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरा करावा, असं माझं तुम्हाला आवाहन आहे.
यावर्षी १४ जूनला राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं तुमच्या परिसरात लावा. फळांची आणि फुलांच्या झाडांना उन लागत त्यामुळे त्यांना उन आणि पाणी मिळेल अशाच ठिकाणी लावा ! फळांची आणि फुलांची झाडं याकरता जेणेकरून ती दिसतातही छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी आकर्षित होतात ! बरं पुन्हा ती रस्ते रुंदीकरणात तुटली जाणार नाहीत याचीही काळजी घ्या ! झाडं लावताना ती मोठी झाडं लावा जेणेकरून ती टिकतील , बऱ्याचदा छोटी रोपं लक्ष नाही दिलं तर टिकत नाहीत! अशी झाडं नर्सरीत मिळतात, ती योग्य जागा बघून तुमच्या भागातील स्थानिकांच्या हस्ते त्यांचं रोपण करा. आणि तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना देखील या नव्याने लावलेल्या रोपांची, झाडांची काळजी घेणं, त्याला पाणी घालणं या उपक्रमात सामील करून घ्या, जेणेकरून ती झाडं दीर्घकाळ टिकतील.
तसंच उन्हाळ्यातच नाही तर हल्ली अगदी जानेवारी फेब्रुवारीपासूनच प्राणी, पक्षी पाण्यासाठी वणवण फिरताना आढळतात. यावर्षी जर पाऊस कमी झाला तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्राणी पाण्यासाठी वणवण फिरणार आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्ये सुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा आणि फक्त पाणवठे उभारून थांबू नका तर त्यात कायम पाणी असेल असं पहा. साधारणपणे १ ते १.५ महिन्यांपूर्वी चंद्र्पुरमध्ये प्राणी जंगलातून बाहेर येऊन शहरांत पाण्यासाठी वणवण भटकत आहेत अशी दृश्य मी पाहिली, आणि मी तात्काळ माझा चंद्रपूरमधला सहकारी मनदिप रोडेला फोन करून प्राण्यांसाठी पाणवठे करायला सांगितलं. आणि त्याने तात्काळ ते पाणवठे तयार केले. त्यामुळे असेच पाणवठे तयार करा. आणि पाणवठे असोत की वृक्षारोपण असेल, दोन्ही करताना शासकीय यंत्रणेला पण बरोबर घ्या.
यावर्षीचा उन्हाळा हा भीषण होता, आणि हवामान तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की यावर्षीचा पावसाळा हा सरासरीत कमी असणार आहे. यावर्षी जर पाऊस कमी पडला तर त्याचा थेट परिणाम पुढच्या वर्षीच्या उन्हाळयात जाणवणार आहे. बरं हे एक वर्ष घडलं आणि पुढे सगळं आलबेल असेल असं नाही. सध्या राज्यात आणि देशांत वृक्षतोड्यांचं राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. त्यामुळे कदाचित जसं प्राणिसंग्रहालयात जाऊन लहान मुलांना प्राणी दाखवायला लागतात तशी भविष्यात मुलांना झाडं दाखवायला कुठेतरी न्यावं लागेल. त्यामुळे आत्ताच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, कारण सध्या झाडांची जंगलं उध्वस्त करून इमारतींची जंगलं उभी करण्यातच सरकार व्यस्त आहे ! म्हणूनच हा उपक्रम आपण हाती घेत आहोत.
फक्त झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा तसा तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका. आपल्याला लाईक्स आणि व्ह्यूज नाहीत तर झाडं लावून लोकांचे आणि निसर्गाचे आशीर्वाद कमवायचे आहेत.
बाकी जरी १४ जूनला भेट होऊ शकत नसली तरी लवकरच आपली भेट होईल तेंव्हा सविस्तर बोलूच.
आपला नम्र
राज ठाकरे ।
आज शिवराज्याभिषेक दिन. या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
६ जून १६७४ ला जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल त्यावेळचं वातावरण काय आनंदी, उत्साही असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण हिंद प्रांत हा परकीयांच्या आक्रमणाने पूर्ण खचला होता. आक्रमकांच्या फौजांपुढे आपला टिकाव लागणारच नाही हे गृहीत धरून जवळपास प्रत्येक जण आक्रमकांना शरण गेला होता. अशावेळेला 'स्वराज्य' असावं असं स्वप्न बघायचं, आणि वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची आणि पुढे १ वर्षांत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करायची.
पुढे जवळपास २९ वर्ष झुंज देऊन एक असं राज्य जिथे आपली संस्कृती, आपली भाषा, यांना कुठलाही अटकाव नाही, आपली करपद्धती, आपली राज्यशासन पद्धती असलेलं एक राज्य उभं करायचं आणि त्याची घोषणा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगासमोर करायची. हा दिवस असा दिवस आहे ज्याने पुढे मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवलीच पण पुढे ब्रिटिशांच्या विरोधात उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देखील राज्याभिषेक दिनातूनच मिळाली.
या दिवसाची तुलना ही ४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील १३ वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच्याशी होऊ शकते किंवा १४ जुलै १७८९ साली झालेल्या फ्रेंच क्रांतीच्या दिवसाशी होऊ शकते. या दोन्ही घटना घडायच्या आधी जवळपास १०० वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यातून त्यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा विचार रुजवला.
जसं या दोन घटनांनी अमेरिका आणि युरोप यांचा भूगोल बदलला आणि भविष्यच बदललं तशीच ताकद आपल्या शिवराज्याभिषेक दिवसांत आहे.
हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सण म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा.
आणि मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा.
पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !
राज ठाकरे ।
Today is World Environment Day. Against the backdrop of last year's excessive rainfall and the record-breaking summer that everyone has endured, we must view this day beyond mere customary rituals. We, as a society, tend to approach everything with a festive zeal. Consequently, whenever World Environment Day comes around, there is an excessive enthusiasm for planting trees, taking photographs of them, and posting them on social media. Yet, 90% of those trees do not survive even until the same evening. A few years ago, the State Government announced a massive drive to plant millions of trees, and subsequently declared that the task had been completed. Only the government knows where those trees really are. Anyways, at least on this day, both the government and the people of Maharashtra ought to reflect upon what we have already lost, and what we stand to lose in the future, due to the changing environment.
Back in 2014, when I presented the ‘Blueprint of Maharashtra’s Development’, I included a short film as part of the presentation. In it, I emphasized that if development is not coupled with an appreciation for aesthetics and a consideration for the environment, it remains merely superficial and hollow. You have likely witnessed the tangible proof of this reality over the past few years. A competitive race has emerged to claim credit, and to derive satisfaction from, the construction of this road or that bridge. Yet, a single spell of rain, and not even the heavy monsoon rains at that, is enough to throw the entire city into utter chaos. Just the other day, I read a news report stating that during this summer, nobody dared to venture out to work in the fields after 10:00 AM. Are we truly grasping the full significance of what this implies?
Lately, everyone seems to have developed a fascination with big numbers. Fine. Here are some alarming ones:
The loss incurred to the nation's overall productivity this year, due to the extreme heat, amounts to approximately 159 billion dollars. Over the past few years, the inability to work due to scorching temperatures has resulted in an annual loss of roughly 160 billion man-hours. The World Bank estimates that changes in the environment could lead to a decline of 2.5 to 4.5 percent in the country's GDP. According to a global study, 57% of the country's districts, which are home to 76% of the population, are on the brink of suffering severe damage due to environmental changes.
When we cite statistics ranking our economy at this or that position, do we ever intend to take these specific figures into account?
Today, living in cities during the four months of the monsoon is becoming increasingly difficult; in rural areas, excessive rainfall wreaks havoc; and during the four months of summer, life in both rural and urban areas is becoming unbearable. In short, for eight months of the year, we are unable to live a decent life in the very places we inhabit. Why do we feel no remorse over this? I am not opposed to development; building roads and bridges, they are indeed essential, but while doing so, why is there no consideration given to whether we are making our cities truly habitable? In the rains, crops in rural areas get washed away while cars in urban areas float on the water; and yet, are we still going to celebrate this ongoing reality as ‘development’?
Furthermore, under the current central government's tenure over the last 11 years, approximately 173,984 hectares of forest land have been diverted for purposes such as mining, road construction, and the like. And all of this was done specifically for their cherished, singular favorite: the Adani Group. When the country's Prime Minister speaks about climate change during his 'Mann Ki Baat', the true sentiment in his heart remains this: "Regardless of what happens to the forests and trees, our sole objective is to enrich a select few industrialists."
To help you grasp the magnitude of 173,984 hectares, let me offer you an example. 1.73 lakh hectares translates to 1,730 square kilometers. For context, Mumbai's own Sanjay Gandhi National Park covers an area of 104 square kilometers - an ecosystem upon which the very future of the entire city of Mumbai and its surrounding region depends. The loss of 1,730 square kilometers of forest land is equivalent to the destruction of approximately sixteen Sanjay Gandhi National Parks.
Today, young men and women spend their entire days scrolling through various social media platforms; but can we really blame them? We possess nothing substantial in our own surroundings that would compel them to look up and take notice. We lack parks; urban trees have been felled on a massive scale; our hillsides have been hollowed out; and we ourselves have polluted our rivers. Consequently, they seek solace from their loneliness and depression by watching social media 'Reels.' My earnest appeal to these young people is this: insist that the beautiful cities and the preserved natural landscapes you admire on social media be replicated right here in our own land. Hold the system accountable for this; do not be swayed by false statistics or deceptive imagery. If you fail to do this, it is certain that your lives will be reduced to a mere existence no different from that of bugs.
It remains a mystery how our once-nature-worshipping society transformed into one that destroys it. Today, the sacred groves (Devrais) in the Konkan region have survived solely because they were preserved by the local traditions of nature worship. Until we return to our fundamental ethos of nature reverence, things won’t change. We used to believe that discussing or advocating for the environment was the exclusive domain of a handful of nature enthusiasts. However, it has now evolved into a critical issue concerning our economy, public health, agriculture, and the very future of our cities.
Environmental changes have tightened their grip on our lives so inexorably that unless we take immediate action neither we, let alone future generations, will be able to escape their consequences. What kind of Maharashtra are we preparing to hand down to the next generation? A Maharashtra of cities devoid of trees? Of rivers reduced to mere open sewers? Of villages where the summer heat makes it impossible to even step outdoors? Or of lush, beautiful, and livable cities and villages that rival the very best in the world? We must, at the very least, begin to ponder this today. And only if we do so can it truly be said that this World Environment Day has been celebrated.
Raj Thackeray