माझे ४५ वर्ष जुने मित्र अत्यंत प्रेमळ एकनिष्ठ शफी शेख ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आज त्यांचे चिरंजीव हैदर ही पक्षाचे काम अत्यंत प्रामाणिक पणे करता आहेत
हा फोटो १९९३ चा आहे
मध्यप्रदेश मधील काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन ह्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यांनी त्यांच्यावर असलेला गुन्हा लपवला असा आरोप भाजपने केला होता त्यावर निवडणूक आधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस ने ह्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे आणि काँग्रेस ने म्हंटले आहे की हा गुन्हा नव्हता फक्त नोटीस होते . ह्यावेळी काँग्रेस नेते सचिन पायलट, भूपेश बघेल आणि केसी वेणुगोपाल निवडणूक कार्यालयात गेले असता त्यांना प्रवेश दिला नाही त्यामुळे त्यांनी तिथेच धरणे आंदोलन सुरू केले आहे.
निवडून येण्यासाठी ५८ आमदारांची आवश्यकता होती आणि काँग्रेस कडे ६१ आमदार होते. घोडेबाजाराची शक्यता होती त्यामुळे काँग्रेस ने आपले आमदार बेंगलोर ला हलवले होते. परंतु आमदार फोडण्याचे सर्व प्रयत्न करून झाल्यानंतरही आमदार फुटत नसल्यामुळे निवडणूक आयोगाच्या मदतीने मीनाक्षी नटराजन ह्यांचा अर्ज बाद केला असा आरोप काँग्रेस करत आहेत .
एका सर्व सामान्य महिलेला भाजप आणि नरेंद्र मोदी घाबरले आणि कारस्थान करून त्यांचा अर्ज बाद करून लोकशाहीची हत्या केली असेही काँग्रेसने म्हटले आहे.
दुसरीकडे झारखंड मधील भाजप पुरुस्कृत उमेदवार परिमल नाथवाणी ह्यांना आर्ज मधील दुरुस्ती करण्यासाठी उद्या ११ वाजे पर्यंतची मुदत दिली आहे .
निवडणूक आयोगाच्या ह्या दुहेरी भूमिके बद्दल आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहेत त्या मध्ये २०१८ पासून प्रत्येक निवडणूक ही संशयाच्या भोवऱ्यात आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे.