आज आपण #6YearsofPMSVANidhi साजरी करत आहोत. तळागाळातील लाखो पथविक्रेत्यांना (फेरीवाल्यांना) विना-तारण कर्ज, वित्तीय समावेशकता आणि प्रगतीच्या नवीन संधी सुनिश्चित करून या योजनेने त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. ही योजना संपूर्णपणे विश्वास, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरणावर आधारित आहे. ज्यांच्या जिद्दीने आणि उद्योजकतेने आपल्या देशाची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
From Street Side Dreams to Digital First Growth
Six years of PM SVANidhi have brought more than change to the lives of our street vendors. They have brought confidence, opportunity, and a stronger sense of possibility. This was not just a scheme; it reflected PM @narendramodi’s commitment to empower street vendors through Swarozgar, Svavlamban, and Swabhimaan, strengthening the foundation of an Aatmanirbhar Bharat.
A thread on how millions of stories became pathways to financial confidence!
#6YearsofPMSVANidhi
या भीषण उष्णतेमध्ये, आपल्या आजूबाजूच्या पक्ष्यांची आणि प्राण्यांचीही काळजी घेऊया. आपल्या घराबाहेर, बाल्कनी, गच्ची, दुकाने किंवा कार्यालयांबाहेर ठेवलेला पाण्याचा एक छोटासा वाडगा एखाद्या तहानलेल्या पक्ष्यासाठी जीवनदायी ठरू शकतो. या कठीण दिवसांत आपली दयाळू वृत्तीच आपल्याला मार्ग दाखवो.
भारतातील विविध भागांमध्ये सध्या कडक ऊन पडत असून, त्यामुळे अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. ही उष्णता आपल्या सर्वांसाठीच असह्य आहे, त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने शक्य तितकी काळजी घ्यावी. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका (हायड्रेटेड राहा) आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी नक्की ठेवा. अशा हवामानात, इतरांनाही पाण्याचा ग्लास देऊन मदत करा. तुमचे हे छोटेसे सौजन्य खूप मोलाचे ठरेल.
या कडक उन्हाच्या लाटेत जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा वृद्ध आई-वडील, आजी-आजोबा आणि आपल्या प्रियजनांना फोन करून त्यांची चौकशी करा. त्यांना शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ न देण्याची, दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याची आणि शक्य तितकी विश्रांती घेण्याची आठवण करून द्या.
भारत प्रगतीच्या नवनवीन शिखरांना सर करत आहे, परंतु त्याच वेळी अशा अनेक आव्हानांचा सामना आपल्याला करायचा आहे ज्यांच्यावर मात करणे आवश्यक आहे.
माझ्या देशवासियांना माझे हे आवाहन आहे.
एका वर्षापूर्वी, #OperationSindoor दरम्यान आपल्या सशस्त्र दलांनी त्यांचे शौर्य दाखवले आणि आपल्या लोकांवर हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. प्रत्येक भारतीयाला आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. आपल्या दलांचा आणि #OperationSindoor मधील त्यांच्या यशाचा सन्मान म्हणून, आपण सर्वांनी एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसह सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल फोटो खाली सामायिक केलेल्या फोटोमध्ये बदलूया.
एका वर्षापूर्वी, आपल्या सशस्त्र दलांनी #OperationSindoor दरम्यान अतुलनीय धैर्य, अचूकता आणि निर्धाराचे दर्शन घडवले. पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांवर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. संपूर्ण देश आपल्या दलांच्या शौर्याला सलाम करतो.
ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्ध भारताचा खंबीर प्रतिसाद आणि राष्ट्रीय सुरक्षा जपण्याच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतिबिंब होते. या मोहिमेने आपल्या सशस्त्र दलांची व्यावसायिकता, सज्जता आणि समन्वित शक्ती देखील अधोरेखित केली. त्याच वेळी, याने आपल्या दलांमधील वाढती एकात्मता प्रदर्शित केली आणि संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेच्या भारताच्या ध्यासाने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला जी ताकद दिली आहे, ती अधोरेखित केली.
आज, एक वर्षानंतरही, दहशतवादाचा पराभव करण्याच्या आणि त्याची पोषक यंत्रणा नष्ट करण्याच्या आपल्या निर्धारावर आपण कायम आहोत.
गंगटोक येथील 'ऑर्चिडेरियम'ला भेट दिली आणि तिथले सौंदर्य पाहून मी मंत्रमुग्ध झालो. सिक्कीमची समृद्ध जैवविविधता खरोखरच विलक्षण आहे. असे प्रयत्न निसर्गाशी आपले असलेले घट्ट नाते दर्शवतात. ते आपल्याला संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीसाठी देखील प्रेरित करतात.
देवभूमी उत्तराखंडच्या पवित्र भूमीवर, आज श्री केदारनाथ धामाची द्वारे पूर्ण विधी आणि परंपरेनुसार सर्व भक्तांसाठी उघडण्यात आली आहेत.
केदारनाथ धाम आणि चारधाम यात्रा हा आपल्या श्रद्धा, एकता आणि समृद्ध परंपरांचा एक दिव्य उत्सव आहे. या यात्रा भारताच्या शाश्वत सनातन संस्कृतीची झलक देखील सादर करतात.
या वर्षाच्या चारधाम यात्रेच्या शुभ प्रारंभाच्या निमित्ताने, मी उत्तराखंडला भेट देणाऱ्या सर्व भक्तांसाठी एका पत्राद्वारे माझे विचार आणि भावना व्यक्त केल्या आहेत.
मी प्रार्थना करतो की बाबा केदार आपल्या सर्वांवर आशीर्वादांचा वर्षाव करोत आणि आपली यात्रा मंगलमय करोत.
हर हर महादेव!
गेल्या 25-30 वर्षांत तळागाळातील लाखो महिला नेत्या आणि मतप्रवाह ठरवणाऱ्या म्हणून पुढे आल्या आहेत. आज जे त्यांना विरोध करत आहेत, त्यांना भविष्यात याची किंमत मोजावी लागेल.
राष्ट्राच्या उभारणीत अर्ध्या लोकसंख्येला समान भागीदार बनवण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. आपली 'नारी शक्ती' धोरणनिर्मितीचा भाग बनणे ही काळाची गरज आहे.