चेंबर फुटून गेले आहे घुशींनी थैमान घातला आहे. रोगराई पसरण्याची शक्यता आहे तरी कृपया आपण लवकरच चेंबर दुरुस्त करावे गटार सफाई करावी आणि घुशींवर आवर घालावा
गणपत चोरगे चाळ, सुपर स्टार मैदान कासम बाग जय भवानी मार्ग मालाड पूर्व
@mybmcWardPN@mybmc
आज १६ ऑक्टोबर... जागतिक अन्न दिवस.
उदर भरण नोहे
जाणिजे यज्ञ कर्म...
आपल्या पानातील अन्नाचा एक कणदेखील वाया जाणार नाही, असा संकल्प करून जागतिक अन्न दिवस साजरा करूया.
दरारा राज ठाकरे नावाचा....!
नगरसेवक, आमदार, खासदार नाही. युती आघाडीत नाही, सरकार किंवा सत्तेत सहभागी नाही तरी सुद्धा जगातलं सर्वात श्रीमंत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका चे (@mybmc ) आयुक्त त्यांच्या निवास्थानी त्यांना भेटायला जातात.
#MNS#mybmc@mnsadhikrut@mnsreport9
उत्तर भारतीय मतांच्या लाचारीसाठी.
हिंदी भाषा ही मुंबईची "बोलीभाषा "असल्याचे वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक करतात. यांच्यासारखे लोकप्रतिनिधी खरे मराठी भाषेचे मारेकरी आणि महार���ष्ट्राच्या सांस्कृतिक, भाषिक अधोगतीला लागलेले कलंक आहेत.
@mieknathshinde
@mnsadhikrut
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.
केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्�� सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे.
प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांक���ून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात ��ाहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.
आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध���ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.
आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरी��्या प्रतीक्षेत आहेत. कर���जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत.
बरं हिंदी भाषेची सक्ती ��हाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही.
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खप���ून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी.
प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे.
पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत.
माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील.
आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे का��तील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो !
आपला नम्र
राज ठाकरे ।
चला महाराष्ट्राचे नवनिर्माण घडवूया !
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्व मनसैनिकांनी सज्ज होऊया आणि आपल्या राजाच्या पाठीशी खंबीर उभे राहून उज्वल महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लाव��या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवूया आणि भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बेरोजगारी, शिक्षणाचा ढासळता दर्जा, ढासळती कायदा सुव्यवस्था या सर्व नरकासुरांचा यंदाच्या दिवाळी बरोबरीने; विधानसभेम��्ये जिंकून वध करूया !
चला मनसेच्या विकासाच्या रेल्वे इंजिनाला न भूतो न भविष्य अशी गती देऊया.
विधानसभेला नवा महाराष्ट्र घडवूया !