Tamil Nadu has chosen.
A new generation. A new voice. A new imagination.
My good wishes to Thiru Vijay - may he fulfil the hopes of the people of Tamil Nadu.
हे ट्वीट वाचणाऱ्या 10 पैकी 9 लोकांना खालील दोन समस्यांपैकी एक समस्या असू शकते.
भारतातील 47-70 टक्के लोकांना विटामीन B12 ची कमतरता आणि 70-94 लोकांमध्ये विटामीन D3 ची कमतरता आहे.
गावाकडील लोकं सतत थकवा येतो, हातपाय दुखतात म्हणून अधूनमधून पेनकिलर घेतात. तेवढ्यापुरता आराम मिळतो पण वारंवार ही दुखणी डोकं वर काढत राहतात.
काही लोकं एक्स-रे काढतात आणि त्यात सगळं नॉर्मल येतं आणि मग एक वेगळी शंका येते... आपल्याला काहीतरी बाहेरचं झालं आहे, कुणीतरी घरावर जादुटोना केला आहे म्हणून आपण सतत आजारी असतो, सतत थकवा आलेला असतो असं वाटायला लागतं.
एके दिवशी शेजारची एक बाई संध्याकाळी गप्पा मारताना अमक्या बाबाची महिमा सांगायला सुरु करते आणि अनेकांच्या आयुष्यात - बाबा, बुआ, गुरुमाऊली, स्वामीजी, महाराज, भगत, गुरुजी असे भोंदू येतात..
बाबाकडे गाऱ्हाणं मांडलं जातं, बाबाच्या अंगात देव संचारतो, तुझ्यावर तुझ्या घरा शेचारच्याच बाईने उतारा केलाय, पुढचा एक महिना दर रविवारी उपवास कर, प्रत्येक रविवारी घराच्या चारही बाजूला रात्री दहीभात टाक आणि ही पुडी घे, रोज रात्री दुधामध्ये टाकून पी आणि एक महिन्याने मला भेटायला ये. असं सांगून बाबा शांत होतो.
ती बाई बाबाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट नित्यनेमाने मनोभावे करते, बाबाने आपल्याला छत्रछायेत घेतलंय, आता आपण बरे होणार असा विश्वास तिला येत जातो..
सोबत रोज रात्री दुध, बाबाने दिलेली पुडी (यात आयुर्वेदीक औषधं असतात) (एक बाबा तर मेडीकल मध्ये खोकल्यासाठी मिळणारं कफ सिरफ देताना पाहिलेला आहे मी) याने काहीसा फरक पडतो..
एक महिन्याने पुन्हा बाबाकडे गेलेली बाई भारावून गेलेली असते, बाबा खरंच चमत्कारी आहेत, बाबाकडे दैवी शक्ती आहे असा विश्वास तिला आलेला असतो.
दुखणं पूर्ण बरं झालेलं नसलं तरी एक बाबा आपल्याकडून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला बरं करण्यासाठी वेळ देतोय यामुळे माणसं मनाने पंगू होऊ लागतात. पैसे द्यावे लागत नसले तरी मन आणि मेदू आपण गहाण ठेवलेला असते.
एखादी गोष्ट जेव्हा फुकट मिळते तेव्हा आपणच प्रोडक्ट असतो हे आपल्याला कळत नाही. (उदा. लाडकी बहीण)
बाबा हाच भाग्यविधाता आणि बाबा हाच उद्धारकर्ता म्हणून डॉक्टरलाही कमी लेखायला सुरुवात करतात.
याच विश्वासाचा फायदा कधी शरीराने, कधी पैशाने तर कधी मनाने ही भोंदू लोकं घेतात.. साखळी तयार होते, मोठा कल्ट तयार होतो..
गाडी घ्यायची - बाबाला विचारा, शेतात काय पिकवायचं - बाबाला विचारा.. सगळ्याच गोष्टींत बाबा... गाडीला बाबाचं स्टीकर, घराला बाबाचं स्टीकर.. फोनला आणि शाळेत शिकून आयटी इंजिनिअर झालेल्या पोराच्या लॅपटॉपलाही बाबाचाच वॉलपेपर..
भक्तांचा विश्वास काबीज केल्यानंतर हे बाबा त्यांचे खरे रंग दाखवतात, देवाच्या मुर्तीसमोर महिलांची, अल्पवयीन मुलींची अब्रू लुटतात... मंत्री त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात...
ज्या महिलांना या गोष्टी समजतात त्या महिला बाबाकडे जायचं बंद करतात, काही निमुटपणे सहन करत जातात पण बदनामी आणि भितीपोटी कुणीच समोर येऊन बोलत नाही.
अशा बुवाबाजीला विरोध करणाऱ्या दाभोळकरांना जीवे मारलं जातं, पत्रकारांना धमकावलं जातं..
ज्या बुआबाजीच्या विरोधात दाभोळकांना जीव गमवावा लागला त्या बुआंचे पाय महाराष्ट्रातले मंत्री धुतात, त्याने दिलेलं सरबत पितात आणि महाराष्ट्र घडवण्याचा थापा मारतात..
या मंत्र्यांवर, पुढाऱ्यांवर टीका होते तेव्हा यांनी पाळलेली पिलावळं धर्माची ढाल पुढे करुन त्यांच्या संरक्षणाला पुढे येतात.
दाभोळकरांचा खून करणारे आणि खुनाचं समर्थन करणारे कोण हे तर वेगळं सांगायलाच नको...
असो.. आपला मुद्दा विज्ञान आणि विवेक आहे. ज्याप्रमाणे बहुतांश भारतीयांमध्ये विटामीन B12 आणि विटामीन D3 ची कमतरता आहे त्याचप्रमाणे सुमार लोकांचं युग असल्याने विज्ञानवादी आणि विवेकी विचारांची देखील मोठी कमतरता आहे..
ही पोस्ट इथपर्यंत वाचलीच असेल तर वर्षातून एकदा Full Body Checkup करु घ्या..
सध्याची आहारशैली आणि जीवनमान बघता कोणतातरी एक घटक किंवा शुगर आणि कोलेस्ट्रॉल जास्त असण्याची शक्यता असते. वेळीच लक्षात आलं तर लवकर बरे व्हाल आणि बाबाकडे जायची वेळ येणार नाही.
वयाची १८ वर्षे गावाकडे राहिल्यानंतर गावाकडचीच लोकं भोळी असतात, अंधश्रद्धाळू असतात असा माझा समज होता. गावाकडे राहून आपलं काहीच होणार नाही म्हणून शहरात येऊन शिकलो, इथेच नोकरी सुरु केली.
पण जेव्हा शिकलेले IAS अधिकारी, राज्याचा गाडा हाकणारे मंत्री बुआच्या भरवशावर बसलेले आहेत हे कळतं तेव्हा या देशाचं आणि राज्याचं भलं पुढची १०० एक वर्षे तरी होणार नाही याची खात्री पटते.
एक अधेड़ उम्र की विवाहित महिला के लिए वो चमक अलग ही होती है। जब उसके पास एक प्यार करने वाला पति हो, और प्रशंसक हों। मैं अतिशयोक्ति नहीं कर रही, लेकिन मुझे लगता है कि मेरी पोस्ट पर प्रतिक्रिया देने वाले 2-3 पुरुषों को छोड़कर बाकी सभी पेशेवर और सम्मानजनक हैं। सभी को मेरा प्यार,
Wearing this six yards of elegance called Saree on a smoother body.
Wantedly doing naughty things to get attention from the people around me and pretending to be like an innocent soul is many woman's kinda things ❤️