@MahaDGIPR स्वागत आहे पण गट ब मुख्य 25 निकाल तेवढं स्थगित करा चौकशी होईपर्यंत. गट ब मुख्य 26 डिसेंबर मध्ये आहे आणि ती लेंडवे यांच्या काळात झाल्याने चौकशी व्हावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा आम्ही आदर करतो; पण आश्वासनांचा नव्हे, कृतीचा विश्वास हवा.
महाराष्ट्रात खारघर, बदलापूर, संतोष देशमुख, घाटकोपरसह अनेक प्रकरणांत SIT झाल्या. पण त्यांचे पुढे काय झाले, अहवाल कुठे आहेत, जबाबदारांवर काय कारवाई झाली, याचा स्पष्ट हिशेब जनतेसमोर नाही. म्हणून MPSC पेपरफुटीप्रकरणी आणखी एक SIT म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
Article 317 अंतर्गत घटनात्मक प्रक्रिया सुरू करा, स्वतंत्र व न्यायालयीन देखरेखीखाली तपास करा आणि जबाबदारी निश्चित करा.
विद्यार्थ्यांना SIT नको, विश्वासार्ह तपास आणि वेळबद्ध न्याय हवा!
@INCHarshsapkal@INCMaharashtra
#MPSC #ChhatronKiGoonj #StudentsJustice
@Dhananjay4INC गट ब मुख्य निकाल चौकशी पर्यंत स्थगित करावी
गट क पूर्व 26 पुढे गेलीच आहे तर जागा वाढ व्हावी
गट ब मुख्य 26 या डिसेंबर मध्ये आहे त्याचे पेपर लेंडवे काळात सेट झालेत
MPSC महाराष्ट्र राज्य ;
कोणीही गडबड केली असेल तर त्याला वाचवायचे कारण नाही,कोणीही असू द्या त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
“Group B २०२५ पूर्व आणि मुख्य आणि Group C २०२५ पूर्व आणि मुख्य” या झालेल्या परीक्षांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होती ती तत्काळ मुख्यमंत्री देवाभाऊंनी मान्य केली आहे.
गुणांमधील रीचेकिंग करण्याची मागणी सुद्धा मान्य झाली आहे.
@Dev_Fadnavis
मा. फडणवीस साहेब,
आतापर्यंत राज्यात अनेक प्रकरणात SIT स्थापन झाल्या, खारघर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, डॉ. संपदा मुंडे प्रकरण, संतोष देशमुख प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, भंडारा बलात्कार प्रकरण, सुशांतसिंग राजपूत प्रकरण अशी असंख्य प्रकरणे आहेत ज्यामध्ये SIT स्थापन तर झाली पण त्याचं पुढं काय झालं, काय तपास केला? याचा कुणालाच काही ताळमेळ नाही. त्यामुळं MPSC पेपरफुटी प्रकरणात केवळ SIT नेमणं म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार असून ही बाब विद्यार्थ्यांनाही मान्य आहे.
आपल्याला विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर तत्काळ राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपतींना आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची विनंती सरकारने करावी. राष्ट्रपतींकडून प्रक्रिया सुरू झाली तर कारवाई पूर्ण होईपर्यंत राज्यपाल आयोगाच्या अध्यक्षांना निलंबित करू शकतात. ही प्रक्रिया फारच कठीण वाटत असेल तर मित्राला राजीनामा देण्याचा सल्ला द्यावा. मित्राचा सल्लावजा शब्द ते नक्कीच खाली पडू देणार नाहीत.
@Dev_Fadnavis
#MPSC #MPSCPaperLeak
#StudentsDemandJustice
MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेऊन प्रश्न संपणार नाही!
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या संपूर्ण कारभाराची राजकीय जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे. डॉ. विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेणे हा पहिला टप्पा आहे; पण ज्यांच्या सरकारच्या काळात हे सर्व घडले, त्यांनीही उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे. फक्त प्याद्यांचा राजीनामा नको; निर्णय घेणाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करा!
विद्यार्थ्यांना राजीनामा नाही, न्याय आणि पूर्ण Accountability हवी आहे!
@mpsc_office@CMOMaharashtra@INCMaharashtra
#MPSC #StudentsJustice #ChhatronKiGoonj
आयोगाने आपल्या निर्णयाचा लवकर पुन्हा विचार करून नवीन तारखा जाहीर करावे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आर्थिक स्थितीचा विचार करावा एवढे निर्दयपणे वागू नये आधीच दुष्काळ आहे त्यात विद्यार्थी पेपर फुटीने त्रस्त आहेत आता चौथ्यांना परीक्षा पुढे जाते म्हणजे आयोगाला सुधारायचे नाही.
आधीच परीक्षा 2 वेळा पुढे ढकलण्यात आली होती.. आता अजून पुढे ढकलण्यात आली आहे.. आर्थिक, मानसिक स्थिती बिकट होत आहे. आयोगाने परीक्षा नियोजित वेळेत घ्यावी नाहीतर विद्यार्थ्यांवर वाईट परिस्थिती निर्माण होईल.
@mpsc_office@bhimanwar
गट क पुर्व 2026 तारीख
📌12 जुलै
📌27 सप्टेंबर
📌25 ऑक्टोबर
📌3 जानेवारी
वय आणि पैसा ज्याचं जळत त्यालाच कळत
@mpsc_office गट क तारीख चा पुनर्विचार करावा आणि नवीन तारीख द्यावी. स्वायत्तेच्या नावाखाली
परीक्षा पुढे ढकलण्याचा मनमानी कारभार कधी थांबवणार😡😡
@RRPSpeaks@bhimanwar