मंदिरात देव होता, उंबर्यावर लक्ष्मी-नारायणाचा जोडा होता, टिपत असलेल्या कॅमेरामागे दिसत असलेला तो भावूक क्षण होता. ❤️😞
Life end's but love doesn't.
व्हिडिओ क्रेडिट- cinematiccaptures
आपण परिस्थितीनुसार बदलत चलायचं. समजा एखाद्या जवळच्या व्यक्तीचं चुकतंय, तर त्याला 1-2 वेळा समजून सांगायचं. तो तरी ऐकत नसेल तर त्याला त्याच्या परिस्थितीवर सोडून द्यायचं. नंतर स्वतः अपडेट होतं चलायचं.
आपण आधी ज्या व्यक्तीला समजून सांगायचो, तिचं व्यक्ती आपल्यातली सुधारणा पाहत चालते. नंतर येऊन तू बरोबर होता असं सांगून जाते. आयुष्यात जसं जग बदलत तसं स्वतःला अपडेट करत चलायचं. आपण आपलं लावून धरलं की मागं पडत जातो, त्यामुळं जगाची भाषा समजून घेणं गरजेचं असतं.
अधिकमास,धोंड्याचे जेवण हा प्रकार माहित नव्हता.. इंस्टाग्राम वर यावर्षी जावयाचे स्वागत, पाय धुणे,सोने चांदी ,जेवणाचा थाट बघून कळले हा असला ही प्रकार आहे!आधी प्री वेडिंग,आता धोंड्याच्या निमित्ताने पुन्हा प्रदर्शन मांडले आहे! ज्यांच्याकडे पैसे आहे,ऐपत आहे करतात पण ज्यांना झेपत नाही त्या ग्रामीण भागातील मुलींच्या कुटुंबीयांवर किती ताण येत असेल आहेर,मानपान करण्याचा..हा दिखावा कधी बंद होणार आहे?! प्रत्येक गोष्टीचे reel करून तुम्ही नको त्या प्रथा मोठ्या करत आहेत,आपल्याच आई वडिलांवर दबाव वाढतो हे मुलींना कळत नाही? एका घरात दोन ते तीन मुली असतील त्यांनी काय करायचं? हुंडा बळी थांबले का की आता धोंड्याच्या निमित्ताने अजून बळी वाढवायचे? #दिखावाआवरा
"निरर्थक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचं शहाणपण ठेवा."
हे वाक्य दिसायला तसं खूप छोटं आहे, पण त्यात संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे.
भगवान श्रीकृष्णाकडे अपार शक्ती होती. त्यांना हवं असतं, तर ते प्रत्येक अपमानाला उत्तर देऊ शकले असते.
पण त्यांनी प्रत्येक वेळी प्रतिक्रिया दिली नाही.
कारण त्यांना माहीत होतं की काही लोकांना उत्तर दिलं, तर त्यांची किंमत वाढते. काही लोकं तुमच्या वेळेसाठी पात्र नसतात.
पूर्वी गावात एखादा मूर्ख माणूस असेल, तर त्याला फक्त ते गावच ओळखायचं.
आज सोशल मीडियामुळे संपूर्ण जग त्याला ओळखतं.
कुणी काहीही लिहितो. कुणी काहीही बोलतो. कुणी अफवा पसरवतो आणि अनेक सुशिक्षित लोकं त्याला उत्तर देण्यात आपला अमूल्य वेळ घालवतात.
आज सोशल मीडियावर अनेक ट्रोल गँग्स दिसतात. त्यांचं उद्दिष्ट सत्य शोधणं नसतं.
त्यांचं उद्दिष्ट असतं:
तुम्हाला चिडवणं
तुमचं लक्ष विचलित करणं
तुमचा वेळ वाया घालवणं
तुम्हाला भावनिक बनवणं.
ते इतरांच्या यशामुळे अस्वस्थ असतात.
तुम्ही शांत असाल, तर त्यांना त्रास होतो.
तुम्ही प्रगती करत असाल, तर त्यांना जास्त त्रास होतो.
म्हणून ते प्रतिक्रिया मिळवण्यासाठी काहीही बोलतात.
एका उद्योगपतीने मोठा व्यवसाय उभा केला.
त्याच्यावर सतत टीका होत होती.
एका पत्रकाराने विचारलं,
"तुम्ही प्रत्येक टीकेला उत्तर का देत नाही?"
त्याने उत्तर दिले,
"जर मी प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यामागे धावू लागलो तर माझ्या गंतव्यस्थानी कधीच पोहोचणार नाही."
गरुड जेव्हा उंच उडतो, तेव्हा काही कावळे त्याला त्रास देतात.
ते त्याच्या पाठीवर बसतात. त्याला टोचतात.
पण गरुड त्यांच्याशी भांडत बसत नाही.
तो आणखी उंच उडतो.
ज्या उंचीवर ऑक्सिजन कमी होतो, तिथे कावळे आपोआप खाली पडतात.
जीवनातही असंच असतं.
काही लोकांशी वाद घालण्याऐवजी स्वतःची उंची वाढवा.
प्रत्येक टीका महत्त्वाची नसते.
डॉक्टर ऑपरेशन करत असताना, बाहेर बसलेल्या लोकांच्या मतांवर निर्णय घेत नाही.
कारण त्याला त्या विषयाचे ज्ञान असतं.
तसंच,
तुमच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला नसतो.
ज्यांनी तुमचा संघर्ष पाहिलेला नाही, त्यांच्या मतांचं ओझं का वाहायचं?
एकदा भगवान बुद्ध एका गावात गेले.
लोकांनी त्यांचा अपमान केला.
शिवीगाळ केली.
बुद्ध शांत राहिले.
शिष्यांनी विचारले,
"गुरुजी, तुम्ही उत्तर का दिले नाही?"
बुद्ध म्हणाले,
"कोणी भेटवस्तू आणली आणि मी स्वीकारली नाही, तर ती भेट कोणाकडे राहते?"
शिष्य म्हणाले, "ज्याने आणली त्याच्याकडे."
बुद्ध म्हणाले,
"तसेच त्यांचा राग-अपमान-शिवीगाळ मी स्वीकारला नाही."
आज अनेक लोकं सकाळी उठल्यावर देवाचे नाव घेण्याऐवजी कमेंट सेक्शन तपासतात.
कोण काय बोललं? कोणी लाईक केलं? कोणी कोणाला ट्रोल केलं?
हळूहळू दुसऱ्यांच्या मतांचे गुलाम बनतात.
लक्षात ठेवा,
तुमचं मूल्य लाईक्स, फॉलोअर्स किंवा कमेंट्स ठरवत नाहीत.
अनेकांना वाटते की शांत राहणे म्हणजे हार मानणं.
चूक.
कधी कधी शांत राहण्यासाठी जास्त ताकद लागते. कारण प्रतिक्रिया देणं सोपे असते.
संयम ठेवणं कठीण असतं.
जंगलाचा राजा सिंह असतो.
तो प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्याला उत्तर देत नाही.
जर तो तसे करू लागला, तर त्याचं राजेपण संपेल.
आपल्या जीवनातही असंच आहे.
प्रत्येक वाद, प्रत्येक आरोप, प्रत्येक अफवा, प्रत्येक ट्रोल यांना उत्तर देणं आवश्यक नसतं.
आपल्याकडे मर्यादित वेळ आहे.
मर्यादित ऊर्जा आहे.
प्रश्न असा आहे की ती ऊर्जा आपण कुठे खर्च करतो?
स्वप्नांवर?
कुटुंबावर?
शिक्षणावर?
समाजकारणावर?
की
ट्रोल्सना उत्तर देण्यात?
निरर्थक वादात?
अफवांमध्ये?
एखादा मुलगा गरीब परिस्थितीतही अभ्यास करतो.
लोकं त्याच्यावर हसतात.
तो वाद घालत नाही.
तो अभ्यास करतो.
काही वर्षांनी अधिकारी बनतो.
तेव्हा त्याला काही बोलण्याची गरज राहत नाही.
त्याचं यशच लोकांना उत्तर देतं.
जीवनात तुम्हाला तीन प्रकारचे लोक भेटतील.
पहिला प्रकार: तुम्हाला खाली खेचणारे.
दुसरा प्रकार: तुमच्यासोबत चालणारे.
तिसरा प्रकार: तुम्हाला वर उचलणारे.
पहिल्या प्रकाराला दुर्लक्ष करा. दुसऱ्यांचा आदर करा. तिसऱ्यांचे ऋण माना.
सर्वात मोठे स्वातंत्र्य म्हणजे
"लोक काय म्हणतील" यापासून मुक्त होणे.
ज्या दिवशी तुम्ही हे साध्य कराल, त्या दिवशी तुमचे आयुष्य बदलून जाईल.
जीवन खूप मौल्यवान आहे.
ते प्रत्येक ट्रोल, प्रत्येक अफवा, प्रत्येक निरर्थक वाद यांच्यावर खर्च करण्यासाठी नाही.
लक्षात ठेवा:
काही लोक तुमचे लक्ष वळवून घेण्यासाठी तुम्हाला चिडवतात.
तुमची प्रतिक्रिया हेच त्यांचं बक्षीस असतं. म्हणून कधी कधी सर्वात प्रभावी उत्तर म्हणजे, उत्तरच न देणं.
गरुडासारखं उंच उडा. सिंहासारखा आत्मविश्वास ठेवा. बुद्धांसारखे शांत राहा.
प्रत्येक आवाजाला उत्तर देणं आवश्यक नसतं, पण प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं आवश्यक असतं."
तुम्ही कितीही केलं तरी जर तुमची किंमत कळत नसेल, तर काही ठिकाणी शांत राहायला शिका. कारण मीठ कधीच मेन्यू कार्डवर दिसत नाही, पण जेवणात नसेल तर त्याची किंमत सगळ्यांना जाणवते
रातोरात कंपनी बंद करून 700 हून अधिक अभियंत्यांना बेरोजगार करणे हा केवळ व्यावसायिक निर्णय नाही, तर कर्मचाऱ्यांच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे.कर्मचाऱ्यांच्या घामावर उभे राहणारे उद्योग अडचण आली की त्यांनाच वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य आहे?
उद्योग उभे राहतात ते कर्मचाऱ्यांच्या कष्टावर; मग संकटाची किंमत फक्त कर्मचाऱ्यांनीच का मोजायची? उत्तरदायित्वाची वेळ आली की व्यवस्थापन गायब होणे, ही चिंतेची बाब आहे.
#ITSector#Hinjewadi