खा. संजय राऊत : लेखणी ते राजकारण..
राजकारणात अनेक नेते निवडणुका जिंकून मोठे झाले, काही सत्तेच्या जोरावर पुढे आले. परंतु काही व्यक्तिमत्त्वांनी आपल्या लेखणीच्या बळावर, वक्तृत्वाच्या जोरावर आणि राजकीय आक्रमकतेच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली. खासदार संजय राऊत हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव आहे.
संजय राऊत यांचा प्रवास पारंपरिक राजकारण्याचा नाही. ते प्रथम पत्रकार, नंतर संपादक आणि त्यानंतर राजकारणी झाले. त्यामुळे त्यांचे राजकारण हे निवडणूक प्रचारातून नव्हे, तर विचार, लेखन आणि सार्वजनिक संवादातून घडले. महाराष्ट्रात पत्रकारितेतून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
१९८९-९० च्या दशकात त्यांनी पत्रकार म्हणून अत्यंत संवेदनशील विषय हाताळले. त्या काळात मुंबई अंडरवर्ल्ड, बिहारमधील बाहुबली राजकारण, जातीय संघर्ष, संघटित गुन्हेगारी आणि सत्तेचे गुन्हेगारीशी असलेले संबंध या विषयांवर वार्तांकन करणे धोकादायक मानले जात होते. अशा वातावरणात काम केल्यामुळे त्यांच्यात परिस्थितीला थेट सामोरे जाण्याची वृत्ती निर्माण झाली. आज त्यांच्या भाषणांमध्ये दिसणारी निर्भीडता ही केवळ राजकीय शैली नसून त्यांच्या पत्रकारितेच्या अनुभवातून घडलेले व्यक्तिमत्त्व आहे.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांशी संवाद साधण्यासाठी ‘सामना’ हे मुखपत्र सुरू केले. पुढे या वृत्तपत्राचे संपादकीय नेतृत्व करताना संजय राऊत यांनी केवळ बातम्या लिहिल्या नाहीत, तर शिवसेनेची राजकीय विचारधारा, भूमिका आणि शैली शब्दांत मांडली. अनेक दशकांपर्यंत ‘सामना’चा अग्रलेख हा महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा विषय ठरत राहिला. यामुळे ते केवळ संपादक राहिले नाहीत, तर पक्षाचे वैचारिक प्रतिनिधी बनले.
राजकारणात त्यांनी कोणतीही थेट निवडणूक लढवलेली नाही. २००४ पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. संसदेत त्यांनी राष्ट्रीय राजकारण, संघराज्य व्यवस्था, महाराष्ट्राचे प्रश्न आणि पक्षाची भूमिका ठामपणे मांडली. ते जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसले तरी माध्यमांमधील त्यांची उपस्थिती अनेक निवडून आलेल्या नेत्यांपेक्षा अधिक प्रभावी राहिली आहे.
२०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या मोठ्या सत्ताबदलानंतर संजय राऊत सर्वाधिक चर्चेत आले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या काळात ते सातत्याने माध्यमांसमोर दिसत होते. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते, त्या काळातील संवाद प्रक्रियेतील ते महत्त्वाचे सार्वजनिक चेहरे होते. त्यानंतर २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे सातत्याने समर्थन करणारे ते प्रमुख नेते ठरले.
संजय राऊत यांच्या राजकारणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संवादक म्हणून असलेली क्षमता. पत्रकार परिषद, मुलाखती, अग्रलेख किंवा संसदीय भाषण अशा कोणत्याही माध्यमातून ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात. त्यामुळे त्यांचे समर्थक त्यांना पक्षाचा प्रभावी आवाज मानतात, तर विरोधक त्यांच्या भाषेला वादग्रस्त म्हणतात. या दोन टोकांच्या मतांमध्येच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये दडलेली आहेत.
त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादही झाले. विविध वक्तव्ये, चौकशा, न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय संघर्ष यांमुळे ते सातत्याने चर्चेत राहिले. मात्र या सर्व घडामोडींमध्ये त्यांनी सार्वजनिक संवादापासून कधीही अंतर ठेवले नाही. उलट प्रत्येक आव्हानाला उत्तर देताना त्यांनी अधिक ठामपणे आपली भूमिका मांडली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेत अनेक बदल झाले. नेतृत्व बदलले, पक्षात फूट पडली, निवडणूक चिन्ह बदलले. या सर्व घडामोडींमध्ये संजय राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचे सार्वजनिक समर्थन करणारे प्रमुख नेते राहिले. त्यामुळे त्यांची ओळख केवळ राज्यसभेचे खासदार म्हणून नसून पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आणि रणनीतीकार म्हणूनही आहे.
संजय राऊत यांचे व्यक्तिमत्त्व एका चौकटीत मावणारे नाही. काहींसाठी ते निर्भीड पत्रकार आणि प्रभावी राजकीय विश्लेषक आहेत, तर काहींसाठी संघर्षात्मक राजकारणाचे प्रतिनिधी. मात्र गेल्या तीन दशकांत त्यांनी पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व आणि राजकीय हस्तक्षेप यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या लेखणीने आणि सार्वजनिक संवादशैलीने समकालीन महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच ठसा उमटवला आहे.
@rautsanjay61
#Maharashtra #SanjayRaut
Praying to God for the safety and well-being of everyone affected by the cloudburst in Arunachal Pradesh🙏🏻
May those suffering find strength, comfort, and a swift recovery.
ऐंशी नव्वदेचा पत्रकारितेचा काळ होता. त्यातच एक मराठी पत्रकार लोकप्रभा कडून बिहारला गेला होता. तिथल्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील माफियांवर लिहिण्यासाठी.
जहानबाद, धनबाद, आरा, गोपालगंज सारख्या बाहुबलींच्या भागात तो पत्रकार वास्तव्यास होता. त्याचवेळी चंद्रशेखर यांचे सरकार पडून देशात मध्यावधी निवडणुका लागल्या होत्या.
त्याचवेळी जहानबाद येथील नौनवी गावात राज्याचे मुख्यमंत्री भेट देणार होते. त्यामुळे सर्व पत्रकार त्याठिकाणी जायला निघाले होते. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, एस. पी, काही मंत्री यांच्या ताफ्यामागे पत्रकारांची एक जीप होती. आणि पत्रकारांच्या जीप पुढे खासदार महेंद्र प्रसाद यांची लाल रंगाची जिप्सी चालली होती. इतक्यात ती लाल रंगाची जिप्सी थांबली. त्यातून एकजण खाली उतरला. आणि त्याने पत्रकारांची जीप आडवली. पण पत्रकारांनी दुर्लक्ष केलं, पण दुर्लक्ष करताच त्या माणसाने जीप च्या चालकाला खाली ओढले.
तेवढ्यात लाल रंगाच्या जिप्सी मधून खासदारांचा भाऊ उतरला. आणि त्याने पत्रकारांशी धक्काबुक्की करत त्यांचे कॅमेरा हिसकावून घेतले.
पत्रकारांनी गावात पोहचताच तिथं उपस्थित असलेले गृहराज्यमंत्री यांच्याकडे त्या खासदार भावाची तक्रार केली. पण खासदारांचे नाव ऐकताच त्यांनी त्या गोष्टीकडे कानाडोळा केला. मग पत्रकारांनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि एस. पी. यांची भेट घेतली.
एस. पी. त्या सर्व पत्रकारांना घेऊन खासदारांच्या लाल रंगाच्या जिप्सी जवळ घेऊन गेले. ती जिप्सी हत्यारांनी गच्च भरली होती. खासदार भावाच्या हातात मशीनगन होती. एस. पी. ला पाहून खासदाराच्या भावाने कॅमेरा मधील रोल ओढून काढला आणि कॅमेरा एस. पी. साहेबांच्या अंगावर फेकला.
तेव्हा पत्रकारांना ताबडतोब पोलिस संरक्षण देऊन पाटणा येथे पाठवण्यात आले. कारण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांचे म्हणणे होते की, खासदाराच्या भावाचा भरवसा नाही. तो चिडला तर ह्या पत्रकारांसोबत काहीही करू शकतो.
सगळे पत्रकार निघून गेले. नौनवी गावात त्याच रात्री बराच नरसंहार झाला. पण एवढ होऊन सुद्धा एक निर्भीड पत्रकार सर्वांसोबत निघून न जाता तिथेच थांबला आणि साक्षीदार झाला त्या सर्व घटनेचा.
तो पत्रकार म्हणजे संजय राऊत...
- कपिल जाधव
@rautsanjay61 जी 🫡
INDIAN EXPRESS DROPS A LAND BOMB ON BJP CM 🔥
After Mohan Yadav became Madhya Pradesh CM, his family and real estate companies reportedly bought at least 137 plots spread over 168 acres in and around Ujjain.
This is the same Ujjain being reshaped for Simhastha 2028 with highways, road widening, townships, riverfront projects, medical city, IT park and new commercial zones.
The most damning part is this: out of the 168 acres bought after he became CM, 111 acres are reportedly located along roads announced by CM Mohan Yadav himself.
His family already had land. But after Dec 2023, the land buying saw a sharp jump, right when Ujjain’s development map started turning into a goldmine.
Indian Express repeatedly asked the CM for answers. He stayed silent.
This is how BJP turns religion into a business model 😡
महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या आशाताईंसारख्या दिग्गज व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना वापरलेली मराठी ऐकून, आज प्रत्यक्ष मराठी भाषादेखील ओशाळली असेल...!
कोल्हापुर BJP नेता — आप भारत को नरेंद्र मोदी या राहुल गांधी के हाथों में देंगे?
जनता — सिर्फ़ राहुल गांधी 🔥
उसके बाद BJP नेता का चेहरा देखने लायक है। 😂
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
नवी मुंबईतील खारघर येथील अरिहंत ग्रुपच्या गृहनिर्माण प्रकल्पात भीषण पाणीटंचाई…
समस्येच्या निषेधार्थ महिला रहिवाशांनी बिल्डरच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला…
यावेळी अरिहंत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक छाजेर यांनी महिलांच्या अंगावर डिफेंडर वाहन घालण्याचा प्रयत्न केला …
मुजोर बिल्डरवर काय कारवाई होणार ???
गृहखातं झोपलं आहे का ???
महिला आयोग जिवंत आहे ???
२४ तास उलटले तरी बिल्डरवर गुन्हा का दाखल नाही ???
@CMOMaharashtra@MumbaiPolice@RaigadPolice@NCWIndia@Dev_Fadnavis
ह्या सर्व खासदारांना फक्त जाण्याची कारण पाहिजे असतात, कोणाला उद्धव साहेब, कोणाला आदित्य साहेब, कोणाला राऊत साहेब तर कोणाला निधी.
जो काही निधी आलाय त्यातला 50 टक्के सुद्धा कामाला लावला नाही कोणी 😬🤦
@AUThackeray@rautsanjay61@andharesushama