आज शिवराज्याभिषेक दिन. या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
६ जून १६७४ ला जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल त्यावेळचं वातावरण काय आनंदी, उत्साही असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण हिंद प्रांत हा परकीयांच्या आक्रमणाने पूर्ण खचला होता. आक्रमकांच्या फौजांपुढे आपला टिकाव लागणारच नाही हे गृहीत धरून जवळपास प्रत्येक जण आक्रमकांना शरण गेला होता. अशावेळेला 'स्वराज्य' असावं असं स्वप्न बघायचं, आणि वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची आणि पुढे १ वर्षांत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करायची.
पुढे जवळपास २९ वर्ष झुंज देऊन एक असं राज्य जिथे आपली संस्कृती, आपली भाषा, यांना कुठलाही अटकाव नाही, आपली करपद्धती, आपली राज्यशासन पद्धती असलेलं एक राज्य उभं करायचं आणि त्याची घोषणा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगासमोर करायची. हा दिवस असा दिवस आहे ज्याने पुढे मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवलीच पण पुढे ब्रिटिशांच्या विरोधात उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देखील राज्याभिषेक दिनातूनच मिळाली.
या दिवसाची तुलना ही ४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील १३ वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच्याशी होऊ शकते किंवा १४ जुलै १७८९ साली झालेल्या फ्रेंच क्रांतीच्या दिवसाशी होऊ शकते. या दोन्ही घटना घडायच्या आधी जवळपास १०० वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यातून त्यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा विचार रुजवला.
जसं या दोन घटनांनी अमेरिका आणि युरोप यांचा भूगोल बदलला आणि भविष्यच बदललं तशीच ताकद आपल्या शिवराज्याभिषेक दिवसांत आहे.
हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सण म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा.
आणि मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा.
पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !
राज ठाकरे ।
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज १९ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र नेक्स्ट हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. १९ मार्च या तारखेचं अजून एक वैशिट्य म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतरची पहिली सभा याच तारखेला झाली होती. त्या सभेत मी महाराष्ट्राचा विकास आराखडा घेऊन येईन असं आश्वासन दिलं होतं. पुढे २०१४ ला अत्यंत विस्तृत आणि प्रगल्भ असा महाराष्ट्राचा विकास आराखडा आम्ही सादर केला. जे पत्रकार २००८ ते २०१४ या काळात, ‘ काय कधी येणार तुमचा विकास आरखडा' हा प्रश्न अत्यंत कुत्सित पद्धतीने विचारत होते त्या पत्रकारांनी ना तो कधी वाचला, ना सत्ताधाऱ्यांनी त्यातून फारसा बोध घेतला. असो.
तो विकास आराखडा सादर करताना, 'विकासाला सौंदर्यदृष्टीची जोड' का असायला हवी या बद्दलचं माझं विवेचन मी एका चित्रफितीतून मांडलं होतं. त्यावेळच्या परिस्थितीवरचं ते माझं भाष्य होतं. पण २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या काळात महाराष्ट्र अजूनच बकाल झाला. विकास म्हणजे रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या झाली आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता, तितक्या हजार कोटींचा रस्ता, त्याची उदघाट्न यातच सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले. आणि याच्या जोडीला अजून एक पेव फुटलं आहे ते म्हणजे विविध योजनांतून नागरिकांना काही ना काही मोफत द्यायचं. नागरिकांना कधीच काही मोफत नको असतं, त्यांना चांगलं आयुष्य हवं असतं. पण हे भानच सुटलं आहे. यात २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्पात सरकारनेच कबुली दिली आहे की राज्यावर कर्जाचा बोजा हा ११ लाख कोटींचा आहे. हे सगळं का घडलं कारण नियोजनशून्यता. विकास ही विचारशील प्रक्रिया याचं भान सुटल्याने हे सगळं घडलं.
या सगळ्यावर विचार करताना, आम्ही असं ठरवलं की पुन्हा एकदा महाराष्ट्राचा एक नवा विकास आराखडा आणूया. पण यावेळेस फक्त तज्ज्ञांचे मत न घेता त्यात जनसहभाग असावा. म्हणून हे संकेतस्थळ विकसित केलं आहे. अनेक मुख्य शीर्षक आणि उप-शीर्षकं याच्यात महाराष्ट्राच्या विकासाचा विचार किती सर्वांगीण व्हावा याची मांडणी केली आहे. लोकांच्या मनातील उत्तम कल्पना आणि अर्थात तज्ज्ञांची मतं याचा मेळ घालत आम्ही पुन्हा एक बृहद विकास आराखडा घेऊन येणार आहोत. आणि तो सरकारला राबवण्यासाठी भाग पाडणार आहोत.
एकूणच सरकारांची श्रवणशक्ती कमी झाली असल्यामुळे तुमचा आवाज त्यांच्या कानांवर पडत असेल असं वाटत नाही. तुमच्या आवाजाचे, तुमच्या अपेक्षांचे, तुमच्या मतांचे आम्ही वाहक होऊ. तुम्ही इथे तुम्हाला ज्या विषयांत तुमच्या कल्पना द्यायच्या आहेत त्या निवडा, त्यावर लिहा. तुमची कल्पना योग्य असेल तर तुमच्या नावासकट ती व्यवस्थेला कळवली जाईल.
महाराष्ट्र नेस्टच्या वेबसाईटची लिंक खाली जोडत आहे.
महाराष्ट्राच्या विकासाच्या तुमच्या कल्पना जरूर कळवा.
https://t.co/5SEZDV4BGM
सस्नेह जय महाराष्ट्र,
आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. काल छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझी सदस्य नोंदणी केली.
माझं महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना आवाहन आहे की या सदस्य नोंदणीतून तुम्ही महाराष्ट्र सैनिक नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात. आमच्यासाठी तुमची जात, धर्म, राजकीय विचारधारा यापेक्षा तुम्ही महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हे पुरेसं आहे. महाराष्ट्रासाठी असंख्य आंदोलनं करणारा पक्ष, अनेक समाजपयोगी उपक्रम चालवणारा पक्ष, आणि महाराष्ट्राचा विस्तृत विकास आराखडा मांडणारा हाच पक्ष आहे. येत्या काळात आम्ही अनेक असे उपक्रम घेऊन येत आहोत ज्यातून महाराष्ट्राच्या विकासाला एक दिशा देणं शक्य आहे, आकार देणं शक्य आहे. या सगळ्यात सामील होण्याची संधी तुम्हाला आहे. ही संधी सोडू नका.
तुम्ही फक्त सदस्य न होता जर सक्रिय सदस्य होणार असाल तर विशेष आनंद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कात टाकत आहे, त्या प्रक्रियेत तुम्हाला योग्य संधी मिळेल हे मी स्वतः पाहीन.
सदस्य नोंदणीसाठी महाराष्ट्रभर माझे सहकारी शाखांच्या बाहेर, आणि गर्दीच्या ठिकाणी स्टॉल्स लावणार आहेत. तुम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्ष नोंदणी करायची असेल तरी हरकत नाही. नाहीतर खाली दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून देखील तुम्ही सदस्य नोंदणी पूर्ण करू शकता.
या सदस्य नोंदणीत महाराष्ट्राचे पाईक होणाऱ्या प्रत्येकाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवारात सहर्ष स्वागत !
आपला नम्र
राज ठाकरे ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विसाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सुरु झालेल्या सदस्य नोंदणीत आज रायगडावर राज साहेबांनी पहिला फॉर्म भरत, सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला. उद्यापासून महाराष्ट्रभर सर्वत्र नोंदणी सुरु होईल.
#MNSAdhikrut
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज पक्षाच्या स्थापनेला २० वर्ष झाली. २० वर्ष हा तसा दीर्घ टप्पा असतो, मग तो व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या आयुष्यातील.
२० वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन या पक्षाची स्थापना झाली. त्यामुळे आज फक्त पक्षाला नाही तर या कल्पनेला वीस वर्ष झाली. ही कल्पना आज दृढ झाली आहे , पण २० वर्षांपूर्वी मराठी माणूस, भाषा, अस्मिता या सर्व गोष्टींचा सर्वांना विसर पडला होता तो जागृत करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं हे सर्वांना मान्यच करायला हवं! मधल्या काळात आपण अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवडणुका लढवल्या कधी यश मिळालं कधी नाही मिळालं पण या सगळ्या प्रवासात मराठी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे लोकांच्या मनात बिंबलं. आज कुठेही मराठी माणसावर अन्याय झाला तर कुठे आहे मनसे असं इतर राजकीय पक्षांचे समर्थक पण विचारतात यातच आपण काय कमावलं आहे याचा अंदाज येईल.
गेल्या २० वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे. पक्ष स्थापनेच्या वेळेस आपल्याच सहकाऱ्यांची त्यांच्या कडेवर असणारी मुलं आता मतदार झाली आहेत, उत्तम काम करत आहेत. ही मुलं तरी आपलीच आहेत, पण महाराष्ट्रात आज जगाला गवसणी घालण्याचं स्वप्न आणि जिद्द बाळगणारी मुलं प्रत्येक तालुक्यात आहेत. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि ती क्रांती महाराष्ट्रात घडावी आणि इतकंच नाही तर हे सगळं आपल्या भाषेत घडावं अशी आमची इच्छा आहे. त्यांना उत्तम आयुष्य म्हणजे काय असावं हे माहित असावं आणि त्यासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी देखील असावी तर आणि तरच महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा भूतकाळ पुन्हा वर्तमानात आणि भविष्यात यावा हीच आमची इच्छा आणि अपेक्षा !
अशा सर्व होतकरू मराठी तरुण-तरुणींना आज तुम्हाला महाराष्ट्राचे पाईक होण्याची संधी आहे. उद्या १० मार्च २०२६ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी सुरु होत आहे. त्यात तुम्ही सहभागी व्हा. तुमची राजकीय विचारधारा, तुमची जात, तुमचा धर्म यापेक्षा तुम्ही आमच्यासारखेच महाराष्ट्र वेडाने झपाटलेले आहात हेच जगाला दिसावं हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि तुम्ही सदस्य झालात म्हणजे नुसते महाराष्ट्र सैनिकच नाही तर महाराष्ट्राचे पाईक होणार आहात हे लक्षात घ्या. एक नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, तुम्ही पक्षाचे सक्रिय सभासद पण होऊ शकता ! या फॅार्म मधे शेवटी हा पर्याय पण दिलेला आहे त्यावर होकार कळवावा , माझे सहकारी आपल्याशी संपर्क साधतील !
त्यासाठी ही सदस्य नोंदणीची संधी सोडू नका. माझे सर्व सहकारी आपल्या भागात प्रत्यक्ष असतीलच परंतू तिथे शक्य नसेल तर त्यासाठीच्या संकेतस्थळाची लिंक उद्या सुरु होत आहे. तेंव्हा याचा लाभ घेत जरूर सदस्य व्हा.
तुमचं मनःपूर्वक स्वागत असेल.
आपला नम्र
राज ठाकरे ।
हिंदूंचे दैवत प्रभू श्री राम यांच्या बद्दल अपशब्द वापरणारी व्यक्ती ही भाजपा बदलापूर महिला मोर्चा अध्यक्ष ची मुलगी निघाली. हेच इतर पक्षातील किंवा इतर कोण असत तर एवढ्यात भाजपा मधील सोकॉल्ड हिंदुत्ववादी नेते बदलापूर मध्ये रान उठवलं असत.
@mnsadhikrut#बेगडीहिंदुत्ववादी#भाजपा
मोर्चा काढणार कि नाही? तुमच्यात नवीन हिंदुत्ववादी नेते पण खुप आहेत हेच इतर पक्षातील लोकांनी केल असत एवढ्यात रान उठवलं असत स्वतःच्या पक्षातील आहेत म्हणून शांततेत विषय मिटवाळ वाटत.
#बेगडीहिंदुत्ववादीभाजपा.
बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत.
प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही.
भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे.
#bjp #badlapur #shreeram #hindu #police
अजित पवारांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला ?
अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्या घटनेबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. याबाबत आमदार श्री. रोहित पवार हे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदवून घ्यायला गेलेले असताना, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला गेला. पोलिसांवर एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकारकडूनच दबाव आणला गेला असं दिसतंय. एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकार दबाव का टाकतंय? एफआयआर नोंदवून घेतलाच पाहिजे असे सक्त निर्देश असताना जर एका आमदाराची तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल ? अजित पवारांच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेनंतर जर त्यांच्या घरच्यांच्या मनात काही शंका असेल आणि त्यांनी याचा तपास व्हावा अशी मागणी पोलिसांकडे केली आणि त्यावर सरकार अजित पवारांसारख्या नेत्याच्या बाबतीत सुद्धा, पोलिसांनी साधा एफआयआर नोंदवून घेऊ नये यासाठी दबाव टाकत असेल तर यात नक्की काय काळंबेरं आहे हे जनतेला कळलंच पाहिजे.
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा.
आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते.
त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच .
या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे.
आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे.
मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही.
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील.
आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे.
यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील.
आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका.
तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा.
राज ठाकरे ।
आज मुंबई महानगरपालिकेचे निकाल आहेत.कोण जिंकेल कोण हरेल याचा निर्णय जनता करेलच पण ज्या हिमतीने माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांनी ही निवडणूक लढवली,मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन
२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे. त्याची झलक दाखवणारी ही चित्रफीत जरूर पहा...