Chandrayaan-3 Mission:
The Rover completed its assignments.
It is now safely parked and set into Sleep mode.
APXS and LIBS payloads are turned off.
Data from these payloads is transmitted to the Earth via the Lander.
Currently, the battery is fully charged.
The solar panel is oriented to receive the light at the next sunrise expected on September 22, 2023.
The receiver is kept on.
Hoping for a successful awakening for another set of assignments!
Else, it will forever stay there as India's lunar ambassador.
Chandrayaan-3 Mission:
The rover was rotated in search of a safe route. The rotation was captured by a Lander Imager Camera.
It feels as though a child is playfully frolicking in the yards of Chandamama, while the mother watches affectionately.
Isn't it?🙂
Happy birthday to one of the finest produced by India, Venkatesh Prasad!
Throwback to the time he gave a perfect reply to Aamir Sohail, what a moment that was!
आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन ठळक कालखंड ठरवायचे झाले तर अर्थात पहिलं, 'टिळक युग' आणि दुसरं 'गांधी युग' असं करता येईल. १९०० ते १९२० ह्या संपूर्ण कालखंडावर टिळकांचा एकूणच भारतीय सार्वजनिक जीवनावर जो पगडा होता त्याची तुलना होणे शक्यच नाही. असं म्हणतात की एकदा टिळक कलकत्त्याला जायला निघाले, तर त्या प्रवासाला जवळपास ११ दिवस लागले कारण इतक्या मोठ्या संख्येने वाटेतल्या प्रत्येक शहरांत टिळकांचं दर्शन घ्यायला, त्यांना भेटायला लोकांची गर्दी जमत होती. तेव्हा खंडप्राय भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आणि मान्यता मिळवलेला हा बहुदा एकमेव मराठी नेता.
'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे....' असं म्हणणाऱ्या टिळकांच्या स्वराज्याबद्दलच्या कल्पना सुस्पष्ट होत्या. त्यांच्या केंद्रीय सत्तेबाबतच्या मांडणीत भाषिक प्रांतरचनेचं महत्व आणि संघराज्यांना संपूर्ण स्वायत्तता ह्या बाबींना मध्यवर्ती स्थान होते. लोकमान्यांच्या ह्या विचाराचं स्मरण, पुरस्काररुपी आशीर्वाद मिळणाऱ्यांना असेल असं मी मानतो.
लोकमान्य टिळकांचे समकालीन नेत्यांशी तात्विक मतभेद होते पण त्यांनी ते मतभेद राष्ट्रहिताच्या आड येऊ दिले नाहीत. तसंच मतभेद आहेत म्हणून समोरच्याचं संपूर्ण चारित्र्यहनन करणं हे त्यांच्या कधीही ध्यानीमनी नव्हते. महात्मा गांधीजींचे आणि त्यांचे तात्विक मतभेद झाले पण त्यांनाही टिळकांबद्दल नितांत आदर होता आणि आपल्याला त्या पार्श्वभूमीवरच पुढे जायचं आहे ह्याचं भान होतं. तसंच टिळकांना देखील उद्याच्या भारतात गांधी हे राष्ट्रनेते ठरू शकतील ह्याची जाणीव होती आणि त्यासाठी टिळकांनी गांधीजींशी कोणतेही वैचारिक मतभेद सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ दिले नाहीत. आज महापुरुषांच्या चारित्र्यहननाच्या काळात टिळकांचा ह्या विचारला पुन्हा उजाळा मिळायला हवा.
रवींद्रनाथ टागोरांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं असा आग्रह टिळकांनी धरला होता, ह्यातून राजकारणात फक्त राजकीय आदर्श पुढे येण्याऐवजी प्रतिभाशक्तीचा आदर्श पण यावा असा आग्रह धरणारे टिळक हे खऱ्या अर्थाने द्रष्टे म्हणावे लागतील, ते ह्यासाठी की सद्य परिस्थितीत, 'सत्तेसाठी वाट्टेल ते'चे आदर्श उभे राहात असताना, प्रतिभा आणि संस्कृती किती महत्वाची आहे ह्याची जाणीव त्यांना होती. ह्या लोकमान्य कर्मयोग्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन.
लेखणीला हत्यार बनवून ज्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, वंचितांच्या व्यथा मांडत मराठी साहित्याचा दीपस्तंभ उभा केला ते अण्णाभाऊ साठे. अण्णांना लौकिक अर्थाने कोणतंही शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही पण तरीही त्यांनी लिहिलेलं साहित्य इतकं अद्वितीय की जगातील जवळपास २७ भाषांमध्ये त्या साहित्याचं भाषांतर झालं. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही अण्णांनी जनजागृतीचे जे प्रचंड काम केलं ते विसरता येणार नाही. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख ह्यांनी जशी मराठी मनं चेतवली तशी पुन्हा एकदा चेतवण्यासाठी अण्णाभाऊंची उणीव अधिकच भासते.
ह्या लोकशाहीराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
There are many sights to see in Amritsar. But the next time I visit the city, apart from visiting the Golden Temple, I will make it a point to visit this ‘Temple of Tea Service’ that Baba has apparently run for over 40 years. Our hearts are potentially the largest temples. #Sunday
If timely and compassionate steps are not taken to heal the people of Manipur then the repercussions could be disastrous… a feeling of alienation can set in; giving rise to sentiments of factionalising from the country. Will not the central government be responsible for this? A heartfelt appeal to our PM Shri. Narendra Modi ji ( @narendramodi ) and Home Minister, Shri. Amit Shah ( @AmitShah ) to take firm and appropriate steps to resolve the situation in Manipur.
#ManipurRiots #ManipurCrisis #ManipurBurning
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
अहमदनगरमधील हनुमाननगर शाळेतील शिक्षक श्री लहू बोराटे यांची बदली झाल्यावरचा हा भावस्पर्शी व्हिडीओ.
असे क्षण फक्त शिक्षकांच्या वाट्याला येतात असे म्हणावेसे वाटते. ❤️❤️
#Miss_U_Sir#Respect_Teachers
वेळ १२:०१ / १४ जून २०२३
मराठी अस्मिता रक्षक ❤️
महाराष्ट्रधर्म रक्षिता ❤️
मराठी संस्कृतीरक्षक ❤️
मराठीभाषा संरक्षक ❤️
हिंदुजननायक ❤️
मराठी मनांचा मानबिंदू ❤️
मराठी हृदयसम्राट ❤️
सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांस जन्मदिनाच्या मनसे शुभेच्छा. साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो 🙏