सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख ।
पाहता ही भूक, तहान गेली ॥
ज्या दैवतासाठी हृदयाचं प्रत्येक स्पंदन अर्पण केलंय त्या दैवताचं प्रत्यक्ष दर्शन !
@PawarSpeaks ❤️
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेला आर्थिक अडचणी आल्या तेंव्हा डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले घर गहाण ठेवून पैसा उभारला. शिव फुले शाहू आंबेडकर विचारांची पताका फडकत ठेवण्यासाठी शिवजन्मभूमीचा हा छावा जिद्दीने काम करतोय. आता क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा विचार समाजासमोर मांडण्यासाठी ते काम करीत असताना प्रतिगामी शक्तींना त्यांचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला आहे. पण डॉ. अमोल कोल्हे या अडथळा दूर करुन लवकरच महाराष्ट्राच्या मातीचा विचार लोकांसमोर मांडण्यासाठी अधिक ताकदीने समोर येतील.
"संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेलं विचारांचं पोलाद भक्कम असतं."
@kolhe_amol #Misavitribaijotiravphule
निर्यातवाढ करणे आवश्यक असताना निर्यातबंदी..?
केंद्र सरकारने अचानक घेतलेला साखर निर्यातबंदीचा निर्णय महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी दुहेरी फटका ठरत आहे. एकीकडे साखरेचा अतिरिक्त साठा, वाढलेली एफआरपी आणि दुसरीकडे निर्यातीवर बंदी; यामुळे साखर उद्योग आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
देशाला परकीय चलनाची गरज असताना आपल्या अतिरिक्त साखरेला जागतिक बाजारपेठेत विक्री करण्याऐवजी गोदामात साठवून ठेवणे हे चुकीचे धोरण आहे. हा निर्णय कोणतीही ठोस पूर्वतयारी न करता घेण्यात आला असून, सरकारने तातडीने याचा पुनर्विचार करून निर्यातबंदी मागे घ्यावी.
#SugarIndustry #AgriPolicy
थलपती विजय या व्हिडिओत जे बोलालले आहेत ते ऐकायला खूप भारी वाटत.आता मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी हे प्रत्यक्षात उतरवून दाखवलं तर याहून चांगलं काही नसेल तामिळनाडूच्या जनतेसाठी..!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमचे सहकारी विकास लवांडे सर यांच्यावर संग्राम भांडारे आणि इतर गुंडांकडून झालेल्या धक्काबुक्की आणि शाईफेकीचा जाहीर निषेध!
पोलिसांनी तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करून या टोळक्याला अटक करावी!
@VikasLawande1@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PawarSpeaks@RRPSpeaks@shindespeaks
लैंगिक शोषण ते मनी लॉन्ड्रीग असा खरात प्रकरणाचा प्रवास सध्या सुरू आहे.
हे सर्वात आधी ओळखल्याने देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातले होते.अर्थात एकच वेळी ५० हून अधिक नेत्यांवर कायमचा अंकुश ठेवण्याची संधी देवेंद्र फडणवीसांसारखे मुत्सद्दी राजकारणी अशीच वाया जाऊ देणार नाही.
आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली,
मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली
साहेबांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली!
अनेक विषयांवर चर्चा झाली!
राज्यात फिरण्याची तयारी सुरू आहे
या माणसाची खरंच कमाल आहे!
माझे मित्र आणि एक प्रतिभावंत अभिनेते रितेश जी देशमुख दिग्दर्शित आणि जिनिलीया देशमुख निर्मित #राजा_शिवाजी चित्रपट लवकरच चित्रपट गृहात झळकणार आहे. शिवछत्रपतींचं उत्तुंग व्यक्तीमत्व या चित्रपटात तेवढंच दमदारपणे साकारलं असणार हे या चित्रपटाचा टीझर पाहूनच दिसतंय..
त्यांच्या या ‘राजा शिवाजी’ चित्रपटास माझ्या मनापासून शुभेच्छा..!
@Riteishd
#राजा_शिवाजी #RajaShivaji
राजकारण हा संधीसाधू खेळ आहे..
संधी मिळाली की बोलायला हवं आणि योग्य वेळ येई पर्यंत शांत राहायला हवं.
पण इतके पण शांत राहून उपयोग नाही की संधीच आपल्या हातून सुटून जाईल.
लोकसभेत आज शून्य प्रहरात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री व माझे ज्येष्ठ बंधू स्व. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला.
माझ्या भावाला जाऊन दोन महिने झाले. याच वर्षी २८ जानेवारीला माझ्या भावाचे प्लेन क्रॅश झाले. या घटनेला केवळ दोन महिने झाले आहेत. एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जेव्हा जातो, त्याचं दुःख त्या कुटुंबालाच माहिती असतं. आम्ही पण हे सोसलं आहे. या घटनेला दोन महिने झाले पण माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला का ? माझा मोठा भाऊ महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. त्याला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाला कसा मिळणार?
माझ्या मोठ्या भावाचा मुलगा रोहितला एक एफआयआर करायला जंग-जंग पछाडावे लागले. आमच्या राज्याने तर 'एफआयआर' नोंदवून घेतलाच नाही. त्यासाठी रोहित सर्वपक्षीय नेत्यांना भेटला. इतर राज्यांमध्ये गेला, अनेकांना विनवण्या केल्या की एफआयआर करा आणि त्याच्या काकाला म्हणजे अजितदादांना न्याय मिळू द्या, असे नमूद केले.
एक एफआयआर करायला एवढी अडचण? या देशातील एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा जेव्हा एवढा मोठा अपघात होतो, त्याचा एफआयआर होत नसेल तर सामान्य माणसाने जायचं कुठे? तो माझा भाऊ होता, अजित पवार जेवढा माझा भाऊ होता, तेवढाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामधला एक लाडका नेता होता. तर एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? माझी नम्रपणे हात जोडून महाराष्ट्र आणि भारत सरकारला विनंती आहे की अजितदादांसह सगळ्यांच्या अपघातांची पारदर्शक चौकशी करा. मग तो अहमदाबादचा असुदे, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये सीडीएस बिपिन रावत गेले तो असुदे, अगर एअर अॅम्ब्युलन्सचा झारखंडला झालेला अपघात असुदे, न्याय हा समानच असला पाहिजे. प्रत्येक कुटुंब मग तो पायलट असेल, माझा दादा असेल, अंगरक्षक असेल किंवा त्या विमानात असलेल्या महिला असतील, त्या विद्यार्थिनी होत्या, त्या तरुण मुलीला पण न्याय मिळाला पाहिजे.
आधी आम्हाला सांगितलं गेलं की ब्लॅक बॉक्स मिळणार, आता सांगितलं जातंय की तो खराब झालाय, हे काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
रोहित पवारांच्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी काल याच्यावर स्टेटमेंट केलं. पण माझी त्यांना नम्रपणे विनंती आहे की तुम्ही जी काही चौकशी अगर तपास करणार आहात तो कालबद्ध चौकटीत करा. या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत. स्व अजितदादा पवारांच्या विमान अपघातातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे, अशी ठाम भूमिका मांडली.
पेट्रोल पंपावर कॅन/ड्रममध्ये डिझेल मिळणार नसल्याचे आदेश अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांकडून काढण्यात आले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दक्षता घेणं गरजेचं असलं तरी यामुळं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसताना दिसतोय.
स्प्रेयर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, डिझेल जनरेटर अशी यंत्रे शेतातच असल्यामुळे शेतकरी सहसा कॅन/ड्रममध्येच डिझेल घेऊन जातात. कामं थांबवून 10-15 किमीवर असलेल्या पंपावर ही यंत्रं न्यायला शेतकऱ्याला वेळेच्या आणि पैशांच्या दृष्टीनेही परवडत नाही. त्यामुळं सरकारने शेतकऱ्यांसाठीही काहीतरी मध्यम मार्ग काढावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीची दोन-चार विमाने ग्राऊंड केली असली तरी बहुतांश विमाने अजूनही सुरूच आहेत. रोहित सिंगच्या लग्नात गाणारा, डान्स करणारा हनी सिंग VSR कंपनीच्याच विमानात बसून मुंबईत येत असल्याचा व्हिडिओ शूट करून पुन्हा महाराष्ट्र सरकारलाच हिणवत नाही का?
“मेरी पहुंच बहोत ऊपर तक है, कोई मेरा कुछ नहीं उखाड सकता” अशी भाषा वापरणाऱ्या V. K. सिंग याची ही गुर्मी का उतरवली जात नाही? एक मराठी नेता, महाराष्ट्राचा लोकनेता गेला तरी सरकार आरोपी कंपनीवर कारवाई करण्यापेक्षा त्याच कंपनीचे विमान वापरण्यावर भर देत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव नाही का?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली..
कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं..!
#AjitdadaPawar
आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील.
Miss you Dada 💔
अखेर VSR कंपनीच्या विमान उड्डाणांवर बंदी!
रोहितदादा आणि समस्त अजितदादा प्रेमींच्या लढ्याला पहिलं मोठं यश! ✊
कितीबी समोर येऊ द्या… त्यांना एकटा बास!
#JusticeForAjitDada#रोहितदादाआमचाअभिमान
वेळ ,शिस्त आणि शब्द न पाळणारे म्हणून नेत्यांबद्दल ज्या काळात लोकांना चीड येते त्याच कालखंडात दिलेला शब्द पाळणारे,प्रत्येक कार्यक्रमात वेळेवर पोहोचणारे आणि कामात आर्थिक,सामाजिक शिस्त पाळणारे नेते म्हणून मी अजितदादांवर प्रचंड प्रेम करणारा व्यक्ती होतो.
अचानक दादांच्या एक्झिट नंतर मी बारामतीमध्ये गेलो नाही किंवा आज मुंबईत असूनही दादांच्या शोकसभेसाठी गेलो नाही,कारण गेल्या काही दिवसात माझा स्वभाव प्रचंड प्रॅक्टिकल झाला आहे.माझ्यामते माणूस गेल्यानंतर आठवणी सोडल्या तर बाकी काहीच शिल्लक राहत नाही.त्यामुळे माझ्यामते दादांना श्रद्धांजली वाहायची असेल तर मी दादांचे २ चांगले गुण अंगीकारेल.
पण जेव्हा मी दादांच्या शोकसभेचे फोटो पाहिले तेव्हा ती प्रचंड सर्वपक्षीय गर्दी पाहून लक्षात आले की दादांनी किती प्रेम कमावले.या पैकी कित्येक लोकांवर दादा चिडले असतील ,रागावले असतील पण तरी ती दादांची शिस्त मानून ते पुढच्या वेळी रागावणार नाही ही काळजी घेणारी हजारो लोकं मी महाराष्ट्रात पाहिली आहेत.
गेल्या काही वर्षात दादांच्या अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर असंख्य किस्से आणि आठवणी आहेत,त्यापैकी बोलण्यासारखं लिहिण्यासारखं खूप काही आहे पण नंतर कधीतरी निवांत लिहिल.
Love you dada❤️
#ajitdada #ajitdadapawar #rememberingajitdada #ajitpawarplanecrash