अजब भ्रष्टाचाराची गजब कहाणी!
आता खरंच MPSCच्या बाबतीत हा सवाल विचारायची वेळ आली आहे!
नुकतीच MPSCने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा थेट ३ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलली. कारण काय तर — सण-उत्सव आणि हिवाळी अधिवेशन!
अहो आयोग महोदय, सण-उत्सव असताना विद्यार्थी अभ्यास करत नाहीत का?
विद्यार्थी सण साजरे करत बसतात म्हणून परीक्षा पुढे ढकलायची का?
आणि हिवाळी अधिवेशनाचा परीक्षेशी नेमका संबंध काय?
विद्यार्थी विधानभवनात जाऊन बसणार आहेत का?
विद्यार्थ्यांना विधानभवनात प्रवेश आहे का?
मग हा प्रश्नही विचारावा लागेल—
या कथित पेपरफुटीच्या चक्रव्यूहात कोणता आमदार सहभागी आहे का?
असा कोणी आमदार आहे का, ज्याला हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानभवनातील कामकाजामुळे कथित गैरप्रकारासाठी वेळ मिळणार नाही, म्हणून परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली?
कारण आम्ही सुरुवातीपासून एकच प्रश्न विचारत आहोत—
- पेपरफुटीच्या या चक्रव्यूहातील “अभिमन्यू” नेमका कोण?
कोण आहे तो, ज्याच्यापर्यंत तपास पोहोचत नाही?
कोण आहेत ते लोक, ज्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळला जातोय?
आणि या संपूर्ण व्यवस्थेमागे नेमके कोणाचे राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण आहे?
आज MPSCच्या विविध परीक्षांबाबत एकामागून एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वासच डळमळीत झाला आहे.
पूर्वी भ्रष्टाचाराची चर्चा झाली तरी अनेक विद्यार्थी म्हणायचे—
“MPSCवर विश्वास आहे.”
पण आता परिस्थिती बदलली आहे.
आयोगाच्या प्रत्येक निर्णयाकडे विद्यार्थी संशयाने पाहत आहेत, याला जबाबदार विद्यार्थी नाहीत; तर पारदर्शकतेबाबत निर्माण झालेले प्रश्न आहेत.
आता गट-क परीक्षा पुढे ढकलण्यामागची कारणे आयोगाने केवळ दोन ओळींत सांगून चालणार नाही.
हिवाळी अधिवेशनाचा नेमका संबंध काय?
जिल्हानिहाय कोणत्या अडचणी आल्या?
प्रशासनाने कोणते अहवाल दिले?
आणि २५ ऑक्टोबर ते ३ जानेवारी एवढा मोठा बदल का आवश्यक ठरला?
या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि पारदर्शक उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावी लागतील.
कारण आता विद्यार्थी जागे झाले आहेत.
एकेक प्रश्न बाहेर येत आहे, एकेक शंका उपस्थित होत आहे आणि एकेक निर्णयाची चिकित्सा होत आहे.
आता वातावरण गरम आहे म्हणून प्रश्न शांत होण्याची वाट पाहायची, आणि नंतर सगळं सुरळीत होईल असा विचार असेल तर तो गैरसमज आहे.
विद्यार्थी शांत होणार नाहीत.
प्रश्न विचारत राहतील.
उत्तर मागत राहतील.
MPSCने शब्दांचा खेळ बंद करून पारदर्शकता दाखवावी!
कारण हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही…
हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा!
- अजब भ्रष्टाचाराची गजब कहाणी…
पण आता विद्यार्थी प्रत्येक पान उघडणार!
आणि या चक्रव्यूहाचा “अभिमन्यू” कोण, हेही शोधणार!
निषेध !
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ तसेच मनुस्मृतीच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने नागपुरात शांततामय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवणाऱ्या या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष @imshivrajmore यांना पोलिसांनी केलेली मारहाण अत्यंत संतापजनक, निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारी आहे.
संविधान हातात घेतल्यावर पोलिसी बळाने युवकांच्या आवाजाचा गळा दाबणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध!
@IYCMaharashtra@IYC
SIR झाल्यानंतरही डुप्लिकेट नावे मतदारयादीत कायम आहेत, तर दुसरीकडे पडताळणी पूर्ण झालेली नावेही वगळण्यात आली आहेत; त्यामुळे हा केवळ ‘एरर’ नसून मतदार वगळण्याच्या अनुषंगाने सुरू असलेला गंभीर प्रकार असल्याचा संशय निर्माण होतो.
.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा बारावा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत आहे; सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासने आणि केलेल्या कमिटमेंट्स जनतेसमोर स्पष्टपणे मांडाव्यात.
राज्यात शेतकरी, कंत्राटदार आत्महत्या करत होते. त्यांच्या पाठोपाठ एका एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केली आहे. सरकारला आता सिस्टम बदलण्यासाठी भावी पिढीचे बळी हवे आहेत का? लंडनला पुरस्कार, डेडिकेटेड कॉरिडॉर वगैरे ठीक आहे, मात्र महाराष्ट्र हा आत्महत्यांचा कॉरिडॉर होत चालला आहे. लोकांच्या मृत्यूचा जीडीपी वाढतो आहे!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@mpsc_office
धाराशिव जिल्ह्यातील खासापुरी (ता. परंडा) येथील प्रथमेश दिलीप देशमुख या २५ वर्षीय तरुणाने आर्थिक विवंचनेतून पुण्यात आत्महत्या केल्याची घटना अत्यंत क्लेशदायक आहे. या तरुणाला भावपूर्ण श्रद्धांजली! त्याच्या निधनामुळे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
गावाकडे दुष्काळ आणि कर्जाचा डोंगर, पुण्यात राहून अभ्यासाचा खर्च, त्यातच लांबलेल्या भरती प्रक्रिया आणि पेपरफुटीमुळे रखडलेली स्वप्ने, या सगळ्या मानसिक आणि आर्थिक ताणातून हुशार, होतकरू तरुणांचे आयुष्य संपणे हे व्यवस्थेचे मोठे अपयश आहे.
माझी शासनाकडे मागणी आहे की, एमपीएससी व सर्व रखडलेल्या भरती प्रक्रिया पारदर्शकपणे आणि वेळेत पूर्ण कराव्यात. भ्रष्ट कारभाराला आळा घालून सक्षम यंत्रणा उभारावी. यासह प्रथमेशच्या कुटुंबाला शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी. प्रथमेश सारखे तरुण मृत्युला कवटाळतात ही अतिशय खेदाची आणि व्यवस्थेचे अपयश स्पष्ट करणारी घटना आहे.
@CMOMaharashtra
"हनुमानअंश"चे यश चिंताजनक आहे कारण ह्यामुळे आपली लोकं पुन्हा "बुवा", "बाबा" यामध्ये अडकणार
अंधश्रद्धेला खतपाणी मिळणार,ती फोफावणार व २९ साली लोकांना पुन्हा धर्मासाठी मत द्यायला बाध्य करणार
रेल्वे थांबवणे, जिभेवर रोप उगवणे,गुहेत साप गळ्याभोवती गुंडाळून बसणे, अंधश्रद्धा प्रेरक आहे
बिग ब्रेकिंग:
खर्गे यांचा अपमान केला म्हणून युवक काँग्रेस ने नागपूर येथे मनुस्मृती जाळून निषेध केला
आंदोलनादरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांचा गळा दाबून त्यांना जखमी केले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे
संबंधित अधिकाऱ्यावर FIR करावी म्हणून👇
माझ्या पुतण्याच्या लग्नात डीजे होता. घरचं लग्न असल्यामुळे लोकं मला नाच म्हणाली. पण डीजेच्या आवाजाने कानात असा काही आवाज आला, मी एका कानाला 40% रिपेअरच करु शकत नाही. डीजेमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे येत्या गणेशोत्सवात तरुणांनी डीजे लावला नाही तर चांगले होईल. - गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा मंत्री
#GulabraoPatil #maharashtra #MarathiNews #LatestNews
MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांसह भ्रष्ट व अनागोंदी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आज नागपूर, नाशिक आणि जळगाव येथे रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा सक्रिय आणि ठाम पाठिंबा आहे!
MPSC ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेली अत्यंत महत्त्वाची परीक्षा संस्था आहे. मात्र सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटी, परीक्षेतील अनियमितता, निर्णयातील गोंधळ आणि प्रशासनातील पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा MPSC वरील विश्वास ढासळत आहे.
या संपूर्ण परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव यांनी स्वतःहून राजीनामा दिलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. पुढील काही दिवस विद्यार्थी सरकारच्या भूमिकेची वाट पाहतील; मात्र मागण्या मान्य न झाल्यास हा लढा अधिक तीव्र होईल.
लोकसभा विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या या संघर्षात सक्रियपणे सहभागी असून, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय विद्यार्थी एक पाऊलही मागे हटणार नाहीत आणि काँग्रेसही त्यांच्या न्यायाच्या लढ्यातून मागे हटणार नाही. सरकारने विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC मधील अनागोंदी आणि गैरप्रकारांना संरक्षण देण्याऐवजी दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही. न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही!
@INCMaharashtra@mpsc_office
#MPSC_आक्रोश_मोर्चा #Bhimnwar_go_back #MPSC #पेपरफुटी #नाशिक #नागपूर #जळगाव #विद्यार्थी_आंदोलन #MPSCProtest #MPSCScam #MPSCStudents #Congress #Maharashtra
@Shivendraraje11#राजं बाया नाचवायच्या झाल्या असतील मराठय़ांना एक महिन्यात सातारा गॅझेट लागु करतो म्हणून गेल्या वर्षी दिलेला शब्द पाळायच बघा जरा..🙏
#Maratha 🚩
MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या...
प्रथमेश दिलीप देशमुख
मूळ गाव खासापुरी ता. परंडा जिल्हा धाराशिव.
दोन दिवसापूर्वी प्रथमेश घरी गेला होता घरचे सोयाबीन पूर्णपणे जळालेले पाहून तो नैराशेत गेला होता. वडील नाहीत पाच बहिणी व आई हेच त्याचे कुटुंब.
आर्थिक परिस्थिती नाजूक असताना स्पर्धा परीक्षेची तयारी पुण्यात करत असताना भविष्यातील आर्थिक खर्च कसा पेलवायचा याचेही टेन्शन होतेच. MPSC मधील पेपर फुटी धोक्यात गेलेले भविष्य आणि धोक्यात गेलेली शेती पुढे होणार काय? या चिंतेतून ही आत्महत्या झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. आज सकाळी पुणे येथे त्यांच्या रूम मध्ये ही आत्महत्या केली.
सरकार ने या आत्महत्या कडे गांभीर्याने पहावे ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@RealBacchuKadu@VikramPachpute_@RRPSpeaks