आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .
राज्यात सरळसेवा भरतीसाठी उमेदवारांकडून १ हजार रु शुल्क याप्रमाणे एकाच परिक्षेसाठी खासगी कंपन्या १०० कोटीहून अधिक रुक्कम जमा करतात. #MPSC चं बजेट ६० कोटी असताना एकाच परिक्षेसाठी खासगी कंपनी १०० कोटी रु. आकारत असेल तर ही विद्यार्थ्यांची लूट आहे. ती थांबवण्यासाठी #MPSC ला आर्थिक पाठबळ देऊन सर्व परीक्षा #MPSC मार्फत घ्याव्यात आणि या प्रक्रियेसाठी वेळ लागत असेल तर खासगी कंपनीमार्फत परिक्षा घेताना उमेदवारांकडून केवळ १०० रुपये आकारुन उर्वरीत शुल्क सरकारने भरण्याची विनंती उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांना भेटून केली. तसंच विद्यार्थ्यांवरील परीक्षा शुल्काचा भार कमी करण्यासाठी राजस्थान सरकारच्या धर्तीवर one time registration system सुरु करण्यासंदर्भात विचार करण्याची विनंतीही यावेळी केली. यासंदर्भात त्यांनीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
एसी गाडीत बसून बिसलरी चे पाणी पिऊन दुष्काळावर चर्चा करणे म्हणजे मूर्खा चा वार्तालाप त्यासाठी आमच्या मायबापाच्या पायाला पडणाऱ्या भेगा पाहाव्या लागतात सर्व मायबाप सरकारला विनंती यावेळेस शेतकऱ्याला भरभरून मदत करा...