देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी,देशाच्या विकासासाठी योगदान देणारी @INCIndia आज अडचणीत आहे पण अडचणीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारण्याचा काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे. या परिस्थितीवर देखील मात करत काँग्रेस देशात व राज्यात अग्रस्थानी येईल यात शंका नाही
काँग्रेस पुन्हा भरारी घेईल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील @INCKarnataka च्या विजयाचे शिल्पकार ठरलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री मा. @siddaramaiah जी यांचा नागरी सत्कार व महानिर्धार मेळावा रविवारी दि.२५ जून रोजी स.१० वा. सांगलीत आयोजित असून तमाम कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
#sangli
|| या भूमंडळाचे ठायी तुज जैसा होणे नाही ||
ज्या भूतकाळाकडे पाहिल की भविष्यकाळ घडवण्याची वर्तमान दृष्टी प्राप्त होते असा शौर्याचा इतिहास या मातीत घडविणारे तेजस्वी सूर्य छत्रपती #शिवाजी_महाराज यांना मानाचा मुजरा!
#शिवराज्याभिषेक_दिन निमित्त सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!
शिंदे गटाचे आमदार सुरत ला रवाना झाले होते त्यावेळी अशीच चौकशी केली होती का असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या ॲड यशोमती ठाकूर यांनी गुजरात पोलीसांना केला. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ गुजरात ला जात असलेल्या आमदार आणि नेत्यांची गाड्या अडवून चौकशी होत आहे.
आधी बोलण्याच्या अधिकारांवर गधा आलीच होती आता सुरतला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आडवून सरकार भविष्यात मुक्त फिरण्याचं स्वातंत्र्यही हिसकावणार का?
@INCMaharashtra#Surat#SuratCourt
याचना नही अब रण होगा
संघर्ष बडा भीषण होगा...
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने #कांग्रेस कमिटी सांगली येथे मा. @RahulGandhi यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सत्याग्रह आंदोलन करीत हुकूमशाही मोदी सरकारचा निषेध केला.
@INCMaharashtra@INCIndia#rahulgandhi#daromat
राहुल गांधींना बदनाम करणं यापुढे सोपं राहिलेलं नाही.त्यांनी हे दाखवून दिलं आहे की बदनाम केल्यामुळे ते राजकारणात मागे पडले असतील पण त्यांच्यावर असलेली देश एकसंघ ठेवण्याची त्यांची जबाबदारी ते पार पाडण्यात कधीही मागे सरणार नाहीत
@incmaharashtra@rahulgandhi#Congress#RahulGandhi
याच कोरोनाच्या काळात मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकार पाडले. सरकार बनवलं. विधानसभेच्या पोटनिवडणुका घेतल्या. बिहारच्या निवडणुका घेतल्या. बंगालमध्ये दाढी वाढवून प्रचार केला.
आणि आत्ता भारत जोडो यात्रेला रोखण्यासाठी त्याच कोरोनाचं कारण शोधलं जातंय.
#BharatJodoYatra#RahulGandhi
स्वातंत्र्यलढ्यात भाजप नेत्यांना अनेकदा काँग्रेसची कमतरता दिसून येते. अगदी महात्मा गांधी, नेहरूंच्या वर टीकाही करतात. पण काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात लढताना १९२५ मध्ये स्थापन झालेल्या आरएसएसकडून शिकायला हवे होते असे ते कधीच का म्हणत नाहीत?
@INCMaharashtra
आपल्या मुलांचे करिअर सुनिश्चित करण्यासाठी भाजपचे नेते आपल्या मुलांना चांगल्या परदेशी संस्थांमध्ये पाठवतात. पण गरीब लोकांना मात्र इंग्रजी भाषेचा, ज्ञानाचा बहिष्कार करायला सांगतात. आणि आपल्या राजकारणासाठी कच्च्या मालात रूपांतर करतात. ही सर्वात मोठी फसवणूक आहे.
#RahulGandhi
अर्जेंटिनाचे फुटबॉल विश्वचषक विजयाबद्दल अभिनंदन. लियोनेल मेस्सीचा शेवटचा वर्ल्डकप असल्यामुळे सर्वांनाच त्याने जिंकावं असं वाटतं होतं. फ्रान्सच्या एम्बाप्पेचा ही खेळ अप्रतिम होता. खर्या अर्थाने फुटबॉल फायनलचा रोमांच काय असतो हे अनेक वर्षानंतर पाहायला मिळाले
#FIFAWorldCup#Messi𓃵
गेल्या काही काळापासून चीनचे वाढते हल्ले सीमाप्रश्नावर देशाची चिंता वाढवणारे आहेत. पण सातत्याने सरकारकडून जनतेची दिशाभूल करण्यात आली. सत्तेवर येण्याआधी चीनला लाल आँखे दावा करणारे मोदीजी सीमाप्रश्नी एक शब्दही बोलायला का तयार नाहीत?
@INCMaharashtra#IndiaChina#IndianArmy
चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले वक्तव्य हे आक्षेपार्हच होतं. पण म्हणून त्यांच्यावर झालेल्या शाईफेकीचं समर्थन होवू शकत नाही. आपला लढा हा संवैधानिकच हवा. पण गेल्या काही काळापासून भाजप नेत्यांची महापुरुषांबद्दलची बदनामीकारक वक्तव्ये हा योगायोग नक्कीच नाही.
#शाईफेक