या पेपरफुटी मध्ये पूर्ण सेंटर सहभागी आहे यात @TCS चे कर्मचारी पासून ते सेंटर मालक सहभागी आहेत. प्रत्येकाने जागा वाटून घेतलेल्या असतात. असले सेंटर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कारण जलसंपदा विभागाच्या परीक्षा मध्ये वाशिम मध्ये सुध्दा असाच प्रकार घडला होता पण कोणतीही चौकशी झाली नाही की पुढे कोण आरोपी होते हे समजले नाही. तसेच लातूर येथे पण असाच प्रकार झाला होता तिथे tcs च्या कर्मचारी वर गुन्हा नोंद झाला पण खरे आरोपी पकडले गेले नाही. यात सेंटर मालक सुद्धा सहभागी असतात. या तिन्ही ठिकाणी उत्तरे पुरवली गेली होती. म्हणजे पेपर आधीच बाहेर आला होता. यात कोण कोण सहभागी आहेत हे कोणालाच समजत नाही. यात आपले लाडके गृहमंत्री सहभागी आहेत की अजून कोण की त्यामुळे पोलीस अर्थपूर्ण शांत बसलेत का अशी शंका सर्व मुलांना आहे. कारण पुढे काहीच होत नाही होतात ते फक्त पेपरफुटी.
2016 पासून ते आता पर्यंत सरळसेवाचा एकही पेपर व्यवस्थित झाला नाही. प्रत्येक पेपर फुटत आहेत, गुन्हे नोंद पण होतात पण पुढे काहीच नाही. आरोपी खोट चरित्र प्रमाणपत्र काढतो आणि परत घोटाळा करून नोकरीस लागतो. हेच सुरू आहे महाराष्ट्र मध्ये. याला जबाबदार फक्त हे सरकार आहे आणि निष्क्रिय गृहमंत्री. यांना फक्त फोडाफोडीच जमते बाकी इकडे काही झाला तरी काही फरक पडत नाही.
@TCS ला काळ्या यादीत टाका
@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@VijayWadettiwar@RRPSpeaks@PawarSpeaks@Awhadspeaks@DGPMaharashtra@LaturPolice@AAPMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@NANA_PATOLE@PatilKailasB@ShivSenaUBT_@SVW790@TV9Marathi@AUThackeray@RNTata2000
तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे आमचे आधीपासूनच मत आहे, निकालानंतर त्यास दुजोरा मिळताना दिसतो आहे.
तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी पेपरफुटीचे गुन्हे दाखल आहेत अश्या बऱ्याच मुलांना 190 प्लस मार्क आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखऊन दुसऱ्या पोस्ट वर जॉब करताय ते पण आता तलाठी होणार आहेत. असेच आम्ही कोणी गुन्हेगार असतील आणि त्यानं जास्त गुण मिळाले असतील त्यांची नावे आम्हाला पाठवावीत. सध्या आमच्याकडे बरीच नावे आहेत तरीही सर्वांनी तुम्हाला माहित असलेले गुन्हेगार मुलांची नावे पाठवावीत ही विनंती.
आमचा व्हॉट्सॲप क्रमांक : 8668378583
टेलिग्राम आयडी : @info_samiti@maharevenue@RVikhePatil@drsujayvikhe@RRPSpeaks@Dev_Fadnavis@Awhadspeaks@iambadasdanve@supriya_sule
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, #शासन_आपल्या_दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची #उधळमाप शासनाला चालते. मग #नोकर_भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून #परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज #कंत्राटी #भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला #कंत्राटी_भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.