आज मंत्रालयात कृषी विभागाच्या विविध मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस सहकार मंत्री श्री. दिलीप वळसे पाटील, पणन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ मंत्री श्री. अब्दुल सत्तार, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शेतकरी नेते श्री. रविकांत तुपकर यांच्यासह नियोजन, वित्त, सहकार, मदत व पुनर्वसन, रोजगार हमी योजना, उद्योग, ऊर्जा विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आणि आवश्यक निर्णय घेण्यात आले.
@Dwalsepatil@AbdulSattar_99@DrShingnespeaks@Ravikanttupkar1
आज महानिर्मितीच्या विविध प्रकल्पग्रस्त तसेच अन्य कर्मचारी यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस बीड येथून व्हीसीद्वारे उपस्थित राहिलो.
यावेळी परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. प्रकल्पासाठी मंजूर आकृतीबंधाच्या 50% जागा ह्या प्रकल्पग्रस्तांना राखीव ठेवण्यात येतील असा निर्णय यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतला त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार.
प्रशिक्षण सेवेमध्ये तीन वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारांना सामावून घेणे, कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्या भरतीतही प्रकल्पग्रस्तांना राखीव जागा ठेवणे, 2010 पासून बंद असलेले तंत्रज्ञ-4 हे पद पुन्हा नव्याने भरती सुरू करणे, यासह परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 9व्या संचाच्या उभारणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मा. उपुख्यमंत्री महोदयांनी दिली.
@Dev_Fadnavis@SMungantiwar@cbawankule
#ParliTPS
#DMUpdates
संदर्भ: आप महाराष्ट्र/२०२४/२३०७००१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : "कृषि सेवक" पदाचा सेवक कालावधी रद्द करून "कृषि सहाय्यक" म्हणून सेवेत घेण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र सरकारने २००४ मध्ये शासन निर्णयांनुसार राज्यातील सततची दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यासाठी व वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी कृषि सहाय्यकांची पदे ‘कृषिसेवक’ म्हणून भरणेबाबत निर्णय घेतला होता. यांमधील तरतुदीना अनुसरूनच ‘कृषि सेवक जाहिरात २०२४’ अंतर्गत पात्र उमेदवारांना कृषिसेवक म्हणून नियुक्ती मिळाली असून सध्या अनेक उमेदवार कृषि विभागामधे कार्यरत आहेत. सध्या कृषि सेवकांना पदावर असताना विविध प्रकारच्या प्रशासकीय व वित्तीय जबाबदाऱ्या, विस्तार व प्रशिक्षणाची कामे, नैसर्गिक आपत्तीवेळीच्या विविध जबाबदाऱ्या, निविष्ठा व गुणनियंत्रण, फलोत्पादन/पणन, मृदसंधारण व जलसंधारण, सांख्यिकी/ संनियंत्रण व मूल्यमापन संबंधी विविध कामे तसेच गाव पातळीवरील विविध कामे, वेळोवेळी कृषि विभागाकडून आलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी असे असंख्य कार्ये वेळोवेळी पार पाडावी लागतात. आपणांस ज्ञात आहेच की आपल्याच सरकारच्या नेतृत्वात आणि कृषि विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे नुकताच आपल्या महाराष्ट्र राज्याने देशपातळीवरचा १५ व्या कृषि नेतृत्व समितीचा २०२४ चा ‘सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार’ पटकावला आहे.
आरोग्य विभागाप्रमाणे कृषि हाही घटक अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असुनही शेतकरी हितासाठी राबणाऱ्या कृषीसेवकांना "कृषी सहाय्यक" पदी सेवेत घेऊन न्याय मिळावा हि सर्व कृषीसेवकांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि "कृषि सेवक" पदावरील कर्मचाऱ्यांचा सेवक कालावधी रद्द करून त्यांना "कृषि सहाय्यक" म्हणून सेवेत घेऊन सेवेचे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने अदा करण्यात यावेत या मागणीचा विचार करावा व हजारो कृषीसेवकांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@mieknathshinde@CMOMaharashtra