जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदं भरण्याचं मागणीपत्र लवकरात लवकर MPSC कडं पाठवण्यात यावं. हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणताही विलंब न लावता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis
🚨 MMRDA भरती परीक्षा प्रकरणी उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद 🚨
MMRDA भरती परीक्षा २०२६ संदर्भात हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर उद्या पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या तक्रारी, उपलब्ध कागदपत्रे आणि या संपूर्ण भरती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील दिशा आणि महत्त्वाच्या मागण्या उद्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येतील.
📍 टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई
🗓️ बुधवार, २६ ऑगस्ट २०२६
⏰ दुपारी २.०० वाजता
हा कोणत्याही व्यक्तीविरोधातील विषय नाही. हा प्रश्न आहे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा आणि न्यायाचा. सर्व विद्यार्थी, पालक आणि रोजगाराच्या प्रश्नाशी संबंधित नागरिकांनी उद्याच्या पत्रकार परिषदेची माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर करावी.
उद्याची पत्रकार परिषद, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एक महत्त्वाचे पाऊल!
@INCMaharashtra@DrSanMukherjee@MMRDAOfficial@MMRDA_TWEET@degree_holders@Mpsc_Andolan@mpsc_office@PunyachiMPSC@UPSCinMarathi
#MMRDA #MMRDABharti #रोजगारन्याय #विद्यार्थ्यांचान्याय #भरतीपरीक्षा #StudentsJustice
रोजगार न्याय यात्रेत सिंचन भवन येथे थिय्या आंदोलन!
शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात झालेल्या रोजगार न्याय यात्रेदरम्यान, पुणे महापालिकेपासून पदयात्रेला सुरुवात करून आम्ही सिंचन भवन येथे पोहोचलो. हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे थिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे पदभरतीसाठी MPSC आयोगाकडे तातडीने पाठवावीत, अशी ठाम मागणी करण्यात आली.
AEE, AE, JE आणि CEA या संवर्गातील हजारो पदांच्या भरतीची अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आकृतीबंधाच्या मंजुरीच्या नावाखाली ही भरती अनिश्चित काळासाठी लांबवणे म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांच्या भवितव्याशी खेळ आहे.
सरकारने आता दिरंगाई थांबवून तातडीने निर्णय घ्यावा : आकृतीबंधाला मंजुरी द्या, रिक्त पदे MPSCकडे पाठवा, AEE, AE, JE आणि CEA पदांची भरती तातडीने सुरू करा! रोजगार हा उपकार नाही, तर तरुणांचा हक्क आहे. हा हक्क मिळेपर्यंत रोजगार न्यायाचा संघर्ष सुरूच राहील!
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@Fadanvis007@satejp@VijayWadettiwar@mieknathshinde
#रोजगार_न्याय_यात्रा #रोजगार_न्याय_सत्याग्रह #MPSC #EngineeringJobs #जलसंपदा_विभाग #Pune #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #ChhatronKiGoonjPune #PuneGirls #ChhatronKiGoonjForGirls #StudentVoices #EqualEducation
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर पदभरतीसाठी MPSC आयोगाकडे पाठवण्यात यावीत, ही विनंती.
हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणतीही अनावश्यक दिरंगाई न करता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी.
@RVikhePatil@girishdmahajan@MahaDGIPR@Dev_Fadnavis@Devendra_Office
#WRD_CIVIL_AEE_AE_JE_CEA #जलसंपदा_विभाग #MPSC #EngineeringJobs #MegaRecruitment
How Can Students Trust an Inquiry into the MMRDA Recruitment Scam? This Is the Question on Every Student’s Mind Today!
The alleged irregularities in the MMRDA recruitment process have put the future of thousands of engineering students and candidates at stake. After serious questions were raised regarding the results, normalization process and marks, MMRDA appointed a committee to investigate the matter. However, the appointment of Mr. Johnny Joseph as the Chairman of this committee has raised even more serious concerns among students. The students’ concern is not about an individual. It is about the independence, impartiality and credibility of the inquiry.
It has been reported that in 2015, the then Additional Chief Secretary Kulkarni wrote to the then Chief Secretary raising serious concerns regarding Mr. Johnny Joseph’s integrity, honesty and aspects of his official conduct. If such serious concerns were indeed raised at the official level in the past, then what “test of independence, impartiality and conflict of interest” was applied before appointing the same person to head an inquiry into the alleged irregularities in the MMRDA recruitment process?
Today, students have some simple but deeply troubling questions:
1. If serious questions were reportedly raised in the past regarding aspects of his official conduct, should the same person be entrusted with investigating a matter that directly affects the future of thousands of students?
2. Before making this appointment, were his previous official records and the concerns reportedly raised against him thoroughly examined?
3. Was there no completely independent person available to head the inquiry, someone whose appointment would be beyond even the slightest suspicion of bias or conflict of interest?
4. Students have already lost confidence in the recruitment results and the normalization process. How can they reasonably be expected to place their trust in a committee whose chairman himself is a matter of concern for them?
5. Is it enough to simply state that an inquiry is impartial, or must the process be demonstrably impartial and transparent to the students?
6. If the impartiality and credibility of the person conducting the inquiry itself are being questioned, why should students blindly accept the findings of that inquiry?
This is absolutely not a personal attack on anyone. It is a question of the credibility and integrity of the process. The MMRDA recruitment examination was conducted for 235 posts, with thousands of candidates investing years of their lives preparing for competitive examinations. Candidates have raised serious allegations regarding irregularities in the result and normalization process. Questions have also been raised about seemingly inexplicable differences in the marks of certain candidates.
In such circumstances, the inquiry committee cannot be treated as merely an administrative formality. It is a mechanism that will determine the future of thousands of students across Maharashtra.
Therefore, the students’ demands are clear:
🔴 The government must provide clear answers to the concerns raised regarding the impartiality of the committee headed by Mr. Johnny Joseph.
🔴 Instead of an internal or administrative inquiry by an institution such as MMRDA, there must be a completely independent judicial inquiry.
🔴 The inquiry should preferably be conducted under the supervision of a sitting or retired High Court Judge.
🔴 An independent forensic audit must examine the CBT process, normalization formula, raw marks, normalized marks, answer keys, server logs, examination-centre data, result-processing methodology and all relevant technical records.
🔴 The inquiry report must be made public within a clearly defined timeframe.
🔴 If any irregularity, corruption, collusion or fraud is established, strict criminal action must be taken against everyone found guilty, irrespective of their position, status or political/administrative influence.
Because this is not merely a question about one examination or one result. It is a question of the hard work of thousands of students, the hopes of their families and their future. Students have studied for years. They appeared for the examination with the hope of building a career. And today, instead of certainty about their future, they are left with questions and doubts.
The government must understand:
Students do not want favours; they want justice. Students do not want assurances; they want a transparent investigation. Do not ask students to blindly trust any committee. Give them an independent process that genuinely deserves their trust. The inquiry into the MMRDA recruitment process must be conducted in such a manner that every student can accept its findings with complete confidence.
The inquiry must be independent. The inquiry must be transparent. Whoever is guilty must face action, irrespective of position or influence.
And there must be absolutely no compromise with the future of Maharashtra’s students.
@IndiaToday@aajtak@htTweets@toi@TOIMumbai@EconomicTimes@IndianExpress@the_hindu@BBCBreaking@ZeeTV@CNBCTV18Live@ndtv@dna@republic
=====================================
MMRDA भरती घोटाळ्याच्या चौकशीवर विद्यार्थ्यांचा विश्वास कसा बसणार? हा प्रश्न आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आहे!
MMRDA च्या भरती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकारामुळे हजारो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आणि उमेदवारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकाल, Normalization आणि गुणांबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्यानंतर MMRDA ने चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. मात्र या समितीच्या अध्यक्षपदी मा. जॉनी जोसेफ यांची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात आणखी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रश्न व्यक्तीविरोधाचा नाही; प्रश्न आहे तो चौकशीच्या निष्पक्षतेचा आणि विश्वासार्हतेचा!
२०१५ मध्ये तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव कुलकर्णी यांनी तत्कालीन मुख्य सचिवांना पत्र लिहून जॉनी जोसेफ यांच्या प्रामाणिकपणा, सचोटी आणि त्यांच्या शासकीय कार्यपद्धतीशी संबंधित काही गंभीर बाबींवर चिंता व्यक्त केल्याचे वृत्त आहे. जर अशा प्रकारच्या गंभीर बाबींबाबत अधिकृत पातळीवर पूर्वी प्रश्न उपस्थित झाले असतील, तर आज MMRDA भरती प्रक्रियेच्या कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी त्याच व्यक्तीला समितीचे अध्यक्ष करण्याचा निर्णय घेताना शासनाने कोणती "स्वतंत्रता, निष्पक्षता आणि Conflict of Interest ची कसोटी" लावली?
आज विद्यार्थ्यांच्या मनात काही सरळ आणि अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत:
१.ज्यांच्या स्वतःच्या शासकीय कार्यकाळाबाबत पूर्वी गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचे सांगितले जाते, त्यांनीच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणाची चौकशी करावी का?
२. या नियुक्तीपूर्वी त्यांच्या पूर्वीच्या अधिकृत नोंदी आणि त्यांच्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांची तपासणी करण्यात आली का?
३. चौकशी समितीच्या अध्यक्षपदासाठी पूर्णपणे स्वतंत्र आणि कोणत्याही प्रकारच्या पूर्वग्रहाच्या संशयापासून मुक्त व्यक्ती उपलब्ध नव्हती का?
४. ज्या विद्यार्थ्यांना आधीच निकाल आणि Normalization प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही, त्यांच्याकडून या समितीवर विश्वास ठेवण्याची अपेक्षा कशी केली जाऊ शकते?
५. ‘चौकशी निष्पक्ष आहे’ एवढे सांगणे पुरेसे आहे का, की ती निष्पक्ष असल्याचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दिसले पाहिजे?
६. चौकशी करणाऱ्या व्यक्तीची निष्पक्षता आणि विश्वासार्हताच संशयाच्या भोवऱ्यात असेल, तर त्या चौकशीच्या निष्कर्षांवर विद्यार्थ्यांनी विश्वास का ठेवावा?
हा व्यक्तीविरोध अजिबात नाही. हा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. MMRDA भरती प्रक्रियेत २३५ पदांसाठी परीक्षा झाली. हजारो उमेदवारांनी आपल्या आयुष्याची वर्षे स्पर्धा परीक्षेच्या तयारीत घालवली. निकालाच्या प्रक्रियेत आणि Normalization मध्ये गंभीर विसंगती असल्याचे उमेदवारांकडून आरोप केले जात आहेत. काही उमेदवारांच्या गुणांबाबत अविश्वसनीय तफावत असल्याचेही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा परिस्थितीत चौकशी समिती ही केवळ प्रशासकीय औपचारिकता नसून "राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय घेणारी व्यवस्था" आहे.
म्हणूनच विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट आहे :
🔴 मा. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या निष्पक्षतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची शासनाने स्पष्ट उत्तरे द्यावीत.
🔴 MMRDA सारख्या संस्थेच्या अंतर्गत किंवा प्रशासकीय चौकशीपेक्षा "पूर्णपणे स्वतंत्र न्यायिक चौकशी" करण्यात यावी.
🔴 ही चौकशी "उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली" करण्यात यावी.
🔴 CBT, Normalization Formula, Raw Marks, Normalized Marks, Answer Keys, सर्व्हर लॉग्स, परीक्षा केंद्रांवरील डेटा, निकाल तयार करण्याची प्रक्रिया आणि संबंधित तांत्रिक नोंदींचे "स्वतंत्र Forensic Audit" करण्यात यावे.
🔴 चौकशीचा अहवाल निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक करण्यात यावा.
🔴 चौकशीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, भ्रष्टाचार, संगनमत किंवा फसवणूक आढळल्यास "पद, प्रतिष्ठा किंवा राजकीय/प्रशासकीय प्रभाव न पाहता संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई" करण्यात यावी.
कारण हा केवळ एका परीक्षेचा किंवा एका निकालाचा प्रश्न नाही. हा हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या कुटुंबांच्या अपेक्षांचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे अभ्यास केला, परीक्षा दिली आणि आता त्यांच्या हातात निकालाऐवजी प्रश्नचिन्ह आले आहे.
सरकारने हे लक्षात ठेवावे:
विद्यार्थ्यांना उपकार नकोत; त्यांना न्याय हवा आहे. विद्यार्थ्यांना आश्वासन नको; त्यांना पारदर्शक चौकशी हवी आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही समितीवर अंधविश्वास ठेवायला सांगू नका; त्यांना विश्वास ठेवता येईल अशी स्वतंत्र व्यवस्था द्या. MMRDA भरतीची चौकशी अशी असली पाहिजे की तिच्या निष्कर्षावर प्रत्येक विद्यार्थी डोळे झाकून विश्वास ठेवू शकेल. चौकशी स्वतंत्र हवी, चौकशी पारदर्शक हवी दोषी कोणताही असो, कारवाई झालीच पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड होता कामा नये!
@RahulGandhi@INCHarshsapkal@rautsanjay61@VarshaEGaikwad@RRPSpeaks@AUThackeray@MMRDAOfficial@DrSanMukherjee@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@INCRojgar@Mpsc_Andolan@degree_holders
#MMRDA #MMRDARecruitment #विद्यार्थी_न्याय #JudicialInquiry #Transparency #Accountability #Normalization #StudentsDemandJustice #RojgarNyay #MMRDA_SCAM #MMRDA #JudicialInquiry #Transparency #Accountability #StudentPower #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
@SanjayDRathods मृद व जलसंधारण विभागाचा नवीन आकृतीबंध तयार असूनही केवळ शासन निर्णय (GR) आणि अपूर्ण सेवाप्रवेश नियमांमुळे (Recruitment Rules) हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. आदेश असूनही जाहिरात प्रक्रिया रखडली आहे. @CMOMaharashtra कृपया तात्काळ मंजुरी द्या @SanjayDRathods
@SanjayDRathods मृद व जलसंधारण विभागाचा नवीन आकृतीबंध तयार असूनही केवळ शासन निर्णय (GR) आणि अपूर्ण सेवाप्रवेश नियमांमुळे (Recruitment Rules) हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. आदेश असूनही जाहिरात प्रक्रिया रखडली आहे. @CMOMaharashtra कृपया तात्काळ मंजुरी द्या @SanjayDRathods
WRD 🚨चे मुख्य कामः⬇️सिंचन व्यवस्थापन: शेतीसाठी पाणी पुरवण्यासाठी मोठी धरणे, कालवे (canals) आणि उपसा सिंचन योजनांची निर्मिती व देखभाल करणे.
प्रशासकीय निष्काळजीपणामुळे जमिनी कोरड्या राहिल्या आणि त्याचा थेट फटका बळीराजाला बसला. २०२३ मध्ये राज्यात ६,६६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, तर Jan-June २०२६ या अवघ्या ६ महिन्यांत एकट्या मराठवाड्यात ४६५ शेतकरी आत्महत्या झाल्या! या मृत्यूला रखडलेली भरती जबाबदार नाही का?
दोन दोन मंत्री, १००+ निवेदने दिली...तरी पण,जलसंपदा विभागात (WRD) फक्त 'घोषणांचा पाऊस'! २०२१ पासून २०००+ जागा रिक्त ठेवून सरकार नेमकं काय साध्य करतंय? सिंचन व्यवस्थापन, धरणे- कालव्यांची देखभाल करायला अधिकारीच नसतील तर पाणी शेतापर्यंत पोहोचणार कसं?
एका बाजूला नोकरी अभावी विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा, तर दुसऱ्या बाजूला पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या पदरी मरण ! हे पाप कोणाचे? घोषणा बाजूला ठेवा आणि थेट सांगा - 🛑WRD भरतीची अधिकृत जाहिरात कधी निघणार?@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil@degree_holders
यात्रेत युवकांचा बुलंद आवाज घुमला! 🗣️
#रोजगार, सरकारी भरती आणि पेपरफुटी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत युवकांनी सरकारला जागे केले.
आमच्या भविष्याकडे दुर्लक्ष करू नका, तातडीने न्याय द्या,
हीच सर्वांची मागणी!
@INCMaharashtra@INCHarshsapkal@Dhananjay4INC
I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
@MMRDAOfficial जाहिरात क्र. ०१/२०२६ अंतर्गत नमूद सर्व पदांच्या परीक्षा पार पडल्या आहेत. मात्र, या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि आर्थिक देवाणघेवाणीचे गंभीर आरोप झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
केवळ चौकशी समिती नेमणे पुरेसे नाही. जाहिरात क्र. ०१/२०२६ अंतर्गत सर्व पदांच्या परीक्षा पुन्हा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात आणि संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी.
#MMRDA #MMRDARecruitment #RecruitmentScam #घोटाळा #महाराष्ट्र #Maharashtra
अखेर MMRDA मध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांसह इतर काही पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगित देऊन परिक्षेतील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची समिती स्थापन करण्यात आली. याबाबत मा. एकनाथ शिंदे साहेबांनी कालच आदेश दिले होते, याबाबत त्यांचे मनापासून आभार! ही चौकशी करताना प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही आणि ती निर्धारीत वेळेत पूर्ण होईल आणि तातडीने नव्याने भरती प्रक्रीया राबवण्यात येईल, ही अपेक्षा!
MMRDA भरती परीक्षा : योगायोग की गंभीर प्रश्नचिन्ह?
MMRDA भरती परीक्षेतील काही उमेदवारांच्या यापूर्वीच्या स्पर्धा परीक्षांतील गुण आणि MMRDA परीक्षेतील गुणांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. यामुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
उदाहरणार्थ, काही उमेदवारांचे पूर्वीचे गुण अत्यंत कमी असताना MMRDA परीक्षेत १९२ ते २०० पैकी तब्बल १९८-२०० गुण मिळाले आहेत.
उदाहरणार्थ—
१) Tushar Funde — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 200/200
२) Aniket Dhere — BMC SE: 8.5/100 → MMRDA: 198.38/200
३) Gaurav Yekekar — Nagpur JE: 48/200 → MMRDA: 198/200 (Rank 7)
४) Akash Rakhade — PMC JE: 82/200 → MMRDA: 198/200 (Rank 11)
५) Yogesh Kumar Kathe — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 192/200
हे आकडे स्वतःमध्ये गैरप्रकार सिद्ध करत नाहीत; मात्र अशा असामान्य गुणफरकाची स्वतंत्र आणि तांत्रिक चौकशी होणे आवश्यक आहे.
CCTV Footage, Server Logs, Login-Logout Records, IP/Device Mapping आणि Response Patterns यांची सखोल तपासणी करण्यात यावी.
हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि सरकारी भरती प्रक्रियेवरील विश्वासाचा हा प्रश्न आहे. आरोप खरे असतील तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि आरोप खोटे असतील तर निष्पक्ष चौकशीतून सत्य स्पष्ट झालेच पाहिजे.
परीक्षा पारदर्शक असलीच पाहिजे संशय निर्माण झाला असेल तर चौकशी झालीच पाहिजे!
#MMRDA #ExamTransparency #RecruitmentExam #PMCJE