राज्यात शिक्षकांची ६७००० पदे रिक्त असून तीन-तीन वर्गांना एकच शिक्षक शिकवत आहे. अशा परिस्थितीत #शिक्षकभरती करून शिक्षणव्यवस्था मजबूत करणं आवश्यक असताना राज्य सरकार मात्र शिक्षकभरतीबाबत #serious दिसत नाही. रिक्त पदांच्या ८०% म्हणजेच ५५ हजार जागा भरण्यास वित्त विभागाची मान्यता असतानाही शिक्षक भरतीसाठी सरकारकडून टाळाटाळ होत असून शिक्षणमंत्री केवळ #तारीख_पे_तारीख देत आहेत.
किमान ३० हजार जागांची जाहिरात काढण्याचा अनेकदा शब्द देऊनही सरकारने केवळ ७७२० जागांची जाहिरात काढून शिक्षण व्यवस्थेची चेष्टा चालवलीय. उर्वरित पदे भरण्याची सरकारची कुवत नाही का? ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा डाव तर सरकार आखत नाही ना? गोरगरिबांच्या पोरांना शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचा तर सरकारचा विचार नाही ना? शासनाने संपूर्ण #५५००० पदांच्या शिक्षकभरती संदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा भावी शिक्षक सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
*"कंत्राटी पद्धतीने भरती न करता पूर्वीप्रमाणेच सरळसेवा शासकीय भरती प्रक्रिया करा.आमच्या अदिवासी समाजाच्या १२५०० जागांवरील बोगस आदिवासींना शासन संरक्षण देतेय सर्वोच्च न्यायालयाच्य आदेशानुसार त्यांना हटवून खरे आदिवासींना भरती करा.*
आज #सहजच हा #शिक्षणमंत्री_राजीनामाद्या हा ट्रेंड पाहताना मनात आलं...काय ती सत्ता, जिथं नसते नीतीमत्ता! काय हे सत्ताधारी...ज्यांच्या कृपेने सत्ता, त्यांना न्याय देण्यासाठी ती वापरायची सोडून त्यांनाच धमकावतात! काळ सूड उगवत असतो. जे पेराल तेच उगवतं!
#शिक्षकभरती_55000#शिक्षकभरती
भरतीची प्रक्रिया कशी सुरू आहे मंत्र्यांना स्पष्ट माहीत आहे का? उमेदवारांना धमक्या देऊन काय उपयोग? तुम्हाला एक प्रश्न विचारला तर एवढा राग येतो आम्ही एक वर्ष झाले भारती बद्दल तुमची खोटी आश्वासने ऐकतोय आमची काय अवस्था असेल ते ही जरा समजा..@dvkesarkar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
तुम्ही किती कडक आहात ते दिसतय शिक्षणमंत्री महोदय.... तुमची भाषा पण महाराष्ट्र ऐकतोय... तुमचं वर्तन ही महाराष्ट्र बघत आहे.
शिक्षण मंत्र्यांचा हा Boss Attitude नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण तरुणी खपवून घेणार का ?
केसरकर साहेब,
राज्यातील युवांनी तुम्हाला #शिक्षकभरती बाबत जाब विचारणे गुन्हा झालाय का? तुम्ही अधिवेशनात शिक्षक भरतीची घोषणा केली ती केवळ धूळफेक होती का? सबुरी किती ठेवायची ?
चार वर्गाला शिकवायला एकच शिक्षक असेल तर विद्यार्थी व पालकांनी काय करायचं ? अशाप्रकारे उद्याचे भविष्य तुम्ही घडवणार आहात का ?
तुम्हाला विचारणा केली तर डिसकॉलिफाय करणार असाल तर तुमच्या विचारांच्या माणसांना तुम्ही कॉलिफाय देखील करू शकत असाल, म्हणजे #तलाठी भरतीसह इतर नोकर भरतीत होणारे घोटाळे खरे आहेत का?
#गोंधळलेलेनिकामीसरकार
@dvkesarkar
#12500 विशेष आदिवासी पदभरती कधी होईल. शिंदे साहेब 28 नोव्हेंबर ला एक वर्ष होईल आता .आनंद दिघे साहेबाचे तुम्ही शिष्य आहात.ज्यांची सामाजिक सुरवात आदिवासीं पाड्यावरून झाली..विसरू नका. त्यांची शपथ तुम्हाला आदिवासी युवक बेरोजगार तरुणांना न्याय द्या. @EknathShindefc@cmomaharashtra