समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकांची काय अवस्था करून ठेवली आहे या व्यवस्थेने? दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.
धनंजय नागरगोजे यांना न्याय मिळाला पाहिजे.
तसेच
महाराष्ट्रातील सर्व शिक्षणसेवक यांना देखील न्याय मिळाला पाहिजे
#शिक्षणसेवकरद्दकरा@Dev_Fadnavis@dadajibhuse@AjitPawarSpeaks
सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये केवळ आमदार श्री प्रवीण स्वामी सर यांनी शिक्षकसेवक यांची समस्या समजून घेऊन तिला वाचा फोडल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
बाकी सर्व आमदार मुंग गिळून बसल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध!
#शिक्षणसेवकरद्दकरा
सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये केवळ आमदार श्री प्रवीण स्वामी सर यांनी शिक्षकसेवक यांची समस्या समजून घेऊन तिला वाचा फोडल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
बाकी सर्व आमदार मुंग गिळून बसल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध!
#शिक्षणसेवकरद्दकरा
मा.@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा खेळखंडोबा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक,तहसीलदार,मुख्याधिकारी
होण्याचा अधिकार नाही काय?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केले.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D
व इतर category साठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट- ब व गट -क जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे चक्क 9 महिने जाहिरात
उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले.परिणामी त्यांना परीक्षेचा form भरता येत नाही.
@Dev_Fadnavis महोदय ,
ह्या age bar candidates च काय करणार आहात ? त्यांच्या नुकसानीस
फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून
काय साध्य केले ?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 209 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क
शून्य जागा ????
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात
हरवल्या की काय ????
👉 1000 रुपये फीस च्या नावाखाली लुटले,form भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
माहित होते ना आचारसंहिता लागणार आहे.
मग ह्यांचा विचार का केला नाही ?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर नाहीत.
👉ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांना नियुक्त्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासनांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही ?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय
काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता,आहे व असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
प्रति,
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी,
सस्नेह जय महाराष्ट्र,
ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही !
काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले ! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या 'भारतरत्न'च नाहीत तर काय मग अजून ?
त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे.
तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला.
आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे.
राज ठाकरे ।
@narendramodi@AmitShah@PMOIndia
शिक्षकांचा वनवास कधी संपेल...
राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार मानधनावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही जिल्ह्यात सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्याचे वेतनच शिक्षकांना दिले नाही. यासह अन्य शासकीय कामे दिल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी वाढणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे. काही ठिकाणी तर अजूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. तर टप्पा 2 शिक्षक भरती करण्याचे सरकार नावच घेत नाहीये. त्यामुळे शिक्षकांचा वनवास कधी संपेल असा प्रश्न अनेक शिक्षक फोन तथा प्रत्यक्ष भेटी घेत विचारत आहे. भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तरी सरकारने असे झुलवत ठेवू नये ही माफक अपेक्षा!
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar